शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
3
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
4
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
5
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
6
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
7
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
8
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
9
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
10
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
11
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
12
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
13
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
14
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
15
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
16
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
17
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
18
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
19
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
20
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला

Kolhapur: दहावी परीक्षेत कमी गुण मिळाले, बोरवडेतील विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले; गळफास घेत जीवन संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 17:50 IST

मुरगुड : मंगळवारी लागलेल्या दहावीच्या निकालात ६२.८० टक्के गुण मिळून ही अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने निराश होऊन कागल तालुक्यातील ...

मुरगुड : मंगळवारी लागलेल्या दहावीच्या निकालात ६२.८० टक्के गुण मिळून ही अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने निराश होऊन कागल तालुक्यातील बोरवडे येथील ऋषिकेश नितीन साठे (वय १६) या विद्यार्थ्याने घरीच तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. निकालाचा आनंदोत्सव सुरू असताना, ही दुदैवी घटना उघडकीस आल्याने बिद्री पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद मुरगुड पोलिस स्टेशनमध्ये झाली आहे.कागल तालुक्यातील बोरवडे येथील ऋषिकेश साठे याने दुपारी ऑनलाइन निकाल पाहिला. त्याला ६२.८० टक्के गुण मिळाले होते. त्याने सायंकाळी सहाच्या सुमारास घरातील माळ्यावर नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर नातेवाइकांनी तत्काळ त्याला मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.ऋषिकेश अत्यंत मनमिळावू आणि होतकरू विद्यार्थी होता. त्याचा मित्रपरिवार ही मोठा आहे त्याच्या अचानक जाण्याने बोरवडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तो गावातीलच बोरवडे विद्यालय, बोरवडे येथे दहावीत शिकत होता. त्याच्या आत्महत्येमुळे त्याचे आई-वडील आणि नातेवाइकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. याबाबत बाजीराव शिवाजी साठे याने याबाबत मुरगूड पोलिसात फिर्याद दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSSC Resultदहावीचा निकाल