इचलकरंजी : भाजप हाच सर्वांत मोठा भ्रष्टाचारी पक्ष आहे. अशा पक्षाच्या तालावर उपमुख्यमंत्री अजित पवार नाचतात. भाजपच्या तालावर नाचणारे स्वतंत्र नाहीत, तर ते कैद्यासारखे आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते.आंबेडकर म्हणाले, निवडणुकीमध्ये उमेदवारांची पळवापळवी, दबावतंत्राचा वापर, दमदाटी यावरून महाराष्ट्राचा बिहार होतो की काय, अशी चिंता वाटत आहे. निवडणुकीमध्ये पैसे वाटले जातात आणि ते घेणारेही आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार वाढला आहे.निवडणुकीत पैसा घेतला नसता, तर अशी रस्त्यांची दुरवस्था झाली नसती. सात-सात दिवस पाणी येत नाही. नदी प्रदूषित झाली आहे. त्याला जबाबदार आपणच आहोत. यावेळी सिद्धार्थ कांबळे, संदीप देसाई, सुदर्शन कदम, प्रकाश सुतार, वसंत कोरवी, यशवंत भंडारे, सोमनाथ साळुंखे, जनार्दन गायकवाड, पी.आर. कांबळे, रावसाहेब निर्मळे, संदीप कांबळे, वैशाली कांबळे आदी उपस्थित होते.
पाटीलकी शाहीला कंटाळून आम्ही बाहेर पडलोइचलकरंजी येथील स्थानिक शिव-शाहू आघाडीतून पाटीलकीशाहीला कंटाळून आम्ही बाहेर पडलो. त्यामुळे आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. इचलकरंजी शहराला सहा दिवसांतून एकवेळ पाणी मिळते. वस्त्रनगरी असूनही त्यामानाने आवश्यक स्थानिक स्किल कामगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाले नाही, असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
Web Summary : Prakash Ambedkar accuses BJP of corruption, criticizing Ajit Pawar's alliance. He lamented election malpractices and deteriorating civic conditions in Ichalkaranji, highlighting water scarcity and pollution. He emphasized their exit from Shiv-Shahu alliance due to local dominance and lack of skill development.
Web Summary : प्रकाश आंबेडकर ने भाजपा पर भ्रष्टाचार का आरोप लगाया, अजित पवार के गठबंधन की आलोचना की। उन्होंने इचलकरंजी में चुनावी कदाचार और बिगड़ती नागरिक स्थितियों पर दुख जताया, पानी की कमी और प्रदूषण पर प्रकाश डाला। उन्होंने स्थानीय प्रभुत्व और कौशल विकास की कमी के कारण शिव-शाहू गठबंधन से बाहर निकलने पर जोर दिया।