शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

भीमा कृष्णा स्थिरीकरण योजना शंभर टक्के फसवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:28 IST

कोल्हापूर: महापुराचे अतिरिक्त पाणी वाहून नेण्याचे कारण देत पुढे रेटलेली भीमा कृष्णा स्थिरीकरण योजना ही शंभर टक्के फसवी आहे. ...

कोल्हापूर: महापुराचे अतिरिक्त पाणी वाहून नेण्याचे कारण देत पुढे रेटलेली भीमा कृष्णा स्थिरीकरण योजना ही शंभर टक्के फसवी आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोघांचही यात नुकसान आहे. याच्या मंजुरीला लवादाने विरोध केला असतानाही ती योजना रेटण्याचा अट्टहास का असा सवाल पर्यावरण अभ्यास प्रदीप पुरंदरे यांनी बुधवारी कोल्हापुरात केला.

कोल्हापूर सांगलीत पाठोपाठ येऊन गेलेल्या महापुराच्या संदर्भात राज्यातील पर्यावरण अभ्यासकांनी एकत्र येऊन अभ्यास सुरु केला आहे. यातील एक सदस्य असलेले पुरंदरे हे पहिल्या टप्प्यात राज्यभर दौरे करत आहेत. बुधवारी त्यांनी कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागात सर्व घटकांशी संवाद साधला.

पुरंदरे म्हणाले, स्थिरीकरण योजना वरवर चांगली वाटत असलीतरी ती भविष्यातील पाणीवादाची कारण ठरणारी आहे. मुळातच एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात पाणी वळवणे हे प्रचंड खर्चिक व जैवविविधतेची हानी करणारे आहे, हे माहीत असूनही आतापर्यंत यावर ६०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. आता परत नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट ॲथोरेटिने १२ हजार कोटी रुपये गुंतवून हा प्रकल्प पुढे नेण्याचे ठरवले आहे. मुळात जो प्रकल्प व्यवहार्यच नाही त्यावर एवढा खर्च कशासाठी. हा एक प्रकारे कोरडा जलविकास असून यातून कांहीही साध्य होणार नाही. मुळात पाणी केव्हा जादा आहे, हे कसे ठरवणार आणि महापुराचे चार दिवसाचे पाणी देऊन बाकीचे दिवस काय करणार याची जोवर उत्तरे मिळत नाहीत, तोवर हातचे सोडून पळत्याचे मागे धावण्यासारखे आहे. यापेक्षा धरणांच्या अपूर्ण बांधकामाची कामे करण्यावर भर द्यावा.

बैठकीचे सूत्रसंचालन गिरीश फोंडे यांनी केले. भूगोल विभागाचे प्रा. सचिन पन्हाळकर यांनी पंचगंगा खोऱ्यातील महापुराची निरीक्षणे मांडली. पर्यावरण अभ्यास उदय गायकवाड, आपचे संदीप देसाई, जनता दलाचे शिवाजीराव परुळेकर, मधुकर बाचूळकर, एन.एस.पाटील, प्रकाश कांबळे, प्रसाद जाधव, चंद्रकांत कांडेकरी, आसावरी जाधव यांनी चर्चेत सहभाग घेत सूचना मांडल्या.

नदीजोड अव्यवहार्य

नदीजोड प्रकल्पाविषयी बोलतानाही पुरंदरे यांनी हा प्रकल्प पूर्णपणे अव्यवहारी व पर्यावरणाचे विनाश करणारा असल्याचे निरीक्षण नाेंदवले. नदीपात्रातील गाळाचा सर्व्हे करण्याची आवश्यकता व्यक्त करून नदीपात्रातील बांधकामाच्या बाबतीत वेगळ्या नियमावलीचा विचार करावा लागणार असल्याचेही निरीक्षण मांडले.

चौकट

पूरनियमन नीती गरजेची

कमी वेळात जास्त पाऊस हे आता कायम घडणार हे गृहीत धरून राज्य सरकारने संपूर्ण राज्यासाठी स्वतंत्र पूरनियमन नीतीची गरज आहे. यासाठी कायदा करून त्याची नियमावली व अंमलबजावणीसह महापुराच्या नुकसानीची जबाबदारीही निश्चित करणे ही काळाची गरज आहे.

अलमट्टी निष्कर्षासाठी घाई नको

अलमट्टी धरणामुळे पूर येतो की नाही याचा अजून फारसा अभ्यास झालेला नाही. वडनेरे समितीने २०१२ च्या आकड्यानुसारच निष्कर्ष काढला असलातरी अजूनही अभ्यासाची गरज व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांच्यामुळे पूर आलाच नाही असा घाईघाईने निष्कर्ष काढण्याची अजिबात गरज नाही. अलमट्टी कारणीभूत नाही तर मग जलसंपदा विभाग कर्नाटकशी चर्चा का करते असा सवालही पुरंदरे यांनी केला.

चौकट

नदीकाठचा ऊसही कारणीभूत

महापुराला नदीकाठचा ऊस कारणीभूत ठरल्याचे निरीक्षण नाेंदवताना पुरंदरे यांनी ऊस लागणीची पध्दत बदलायला हवी, पात्रापासून किती अंतरावर शेती करावी याबाबतचे नियम असावेत, असेही सुचवले