शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

साखरपुडा झालाय, लग्नही होवू शकतं - मनसे नेते अविनाश अभ्यंकर

By समीर देशपांडे | Published: April 22, 2024 6:20 PM

कोल्हापूर : आता तरी ३३ गुण जुळलेत. आमचा आता साखरपुडा झालाय. लग्नही होवू शकतं अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ...

कोल्हापूर : आता तरी ३३ गुण जुळलेत. आमचा आता साखरपुडा झालाय. लग्नही होवू शकतं अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्त आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याचे समन्वयक अविनाश अभ्यंकर यांनी ‘मनसे’ कोणासोबत युती करून पुढच्या निवडणुका लढणार का या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. मात्र याबाबत आमचे नेते राज ठाकरे हेच निर्णय घेतील हे सांगायलाही ते विसरले नाहीत.अभ्यंकर हे या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून त्यांनी सोमवारी दुपारी मनसेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अभ्यंकर बोलत होते.

ते म्हणाले, राज ठाकरे यांनी निर्णय घेतल्यानंतर आता प्रत्येक जिल्ह्यांचा आढावा घेतला जात आहे. यानंतर हाच संदेश तालुकापातळीवर जाईल. भविष्यात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी हा निर्णय असून राज यांच्याशिवाय महाराष्ट्रातील राजकारणाचे पानही हलू शकत नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यावेळी राजू दिंर्डाले, प्रसाद पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMNSमनसे