शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

बेळगाव न्यूज : अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत जनतेला अन्नधान्याचे वितरण; ‘त्या’ विधानाबाबत जनतेतून नाराजी,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:29 IST

बेळगाव : केंद्र सरकारच्या अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत आम्ही एका व्यक्तीला पाच किलो पौष्टिक धान्य वाटप करीत आहोत. दक्षिणेतील १२ जिल्ह्यांमध्ये ...

बेळगाव : केंद्र सरकारच्या अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत आम्ही एका व्यक्तीला पाच किलो पौष्टिक धान्य वाटप करीत आहोत. दक्षिणेतील १२ जिल्ह्यांमध्ये ३ किलो नाचणी, २ किलो तांदूळ आणि ३ किलो मका वितरित केला जाणार आहे; तर उत्तर भागातील १२ जिल्ह्यांमध्ये ३ किलो ज्वारी आणि २ किलो नाचणी वाटप केली जाईल, असे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले. बुधवारी, मंत्री उमेश कत्ती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना तांदूळ वाटप करताना २ किलो तांदूळ कमी देण्यात यावेत, असे विधान उमेश कत्ती यांनी करताच त्यांच्यावर जनतेतून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. सोशल साईटवर आणि विरोधी पक्षाने या विधानावर जोरदार प्रतिक्रिया नोंदवताच उमेश कत्ती यांनी माफी मागितली.

केंद्र सरकारने अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ नुसार, दारिद्र्यरेषेखालील लोकांना पाच किलो धान्य आणि त्याचप्रमाणे अंत्योदय रेशनकार्ड असणाऱ्यांना ३५ किलो अन्नधान्य दिले जाणार आहे. राज्यांच्या प्रोत्साहनासाठी आणि सबलीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या आधारभूत किमतीच्या अंतर्गत, नाचणी , मका समर्थन मूल्य योजनेखाली खरेदी करून, राज्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार जनतेला पौष्टिक आहार देण्यात येणार आहे. सध्या ज्वारीसाठी २६४० रुपये समर्थन मूल्य देण्यात येत आहे. परंतु शेतकऱ्यांनी ३५०० ते ४५०० रुपयांची मागणी केली आहे . कृषी आयोगाच्या अहवालात तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री या नात्याने मी केंद्र सरकारकडे ज्वारीसाठी ३५०० ते ४५०० आधारभूत मूल्य देण्याची मागणी करीत असल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, एका व्यक्तीला किती अन्नधान्याची आवश्यकता आहे त्यानुसार धान्य वितरणासंबंधी कायदा करण्यात आला आहे. सध्या ५ किलो धान्याचे वितरण करण्यात येत आहे. त्यानुसार २ किलो तांदूळ कमी करण्याबाबत आपण वक्तव्य केले असून, या वक्तव्याचा कोणीही विपर्यास करून राजकारण करू नये. केंद्र सरकारने अन्न सुरक्षा कायदा लागू केला आहे. अन्नसुरक्षा कायदा काँग्रेस राजवटीत अस्तित्वात आला असून काँग्रेसचाच कायदा आम्ही पुढे नेत असल्याचे उमेश कत्ती म्हणाले.

उमेश कत्ती यांनी केलेल्या विधानानंतर जनतेमध्ये तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. काँग्रेस राज्य अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी उमेश कत्ती यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान, हा सारा प्रकार आणि होणारा विरोध पाहून उमेश कत्ती यांनी साऱ्यांची माफी मागितली. शिवाय डीकेशींना राजीनाम्याबाबत खडे बोल सुनावले. माझा राजीनामा मागणारे डीकेशी आहेत तरी कोण? डीकेशींनी काँग्रेसची शवयात्रा काढावी आणि सिद्धरामय्या यांच्या निवासस्थानासमोर ती पुरावी, अशी प्रतिक्रियाही उमेश कत्ती यांनी दिली.