शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

वीजबिल माफीसाठी कृती समितीचा हिसका, महावितरणला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 19:05 IST

mahavitaran, morcha, kolhapurnews लॉकडाऊन काळातील वीज बिलमाफीसाठी वारंवार निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्याने मंगळवारी सर्वपक्षीय कृती समितीने महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकत सर्व व्यवहार बंद पाडून हिसका दाखवला. कर्मचाऱ्यांना आत सोडण्यावरून आंंदोलकांची पोलीसांबरोबर झटापटही झाली. पोलिसांकडून अटकसत्र सुरू झाल्यानंतरही तब्बल चार तास मुख्य कार्यालयासमोर ठिय्या मारत वीज बिल माफी झालीच पाहिजे या घोषणेने परिसर डोक्यावर घेतला.

ठळक मुद्देमहावितरणला टाळे, कृती समितीचा हिसका वीजबिल माफीसाठी सर्वपक्षीय कृती समितीची गांधीगिरी

 कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील वीज बिलमाफीसाठी वारंवार निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्याने मंगळवारी सर्वपक्षीय कृती समितीने महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकत सर्व व्यवहार बंद पाडून हिसका दाखवला. कर्मचाऱ्यांना आत सोडण्यावरून आंंदोलकांची पोलीसांबरोबर झटापटही झाली. पोलिसांकडून अटकसत्र सुरू झाल्यानंतरही तब्बल चार तास मुख्य कार्यालयासमोर ठिय्या मारत वीज बिल माफी झालीच पाहिजे या घोषणेने परिसर डोक्यावर घेतला.लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीज बिले असल्याने जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. सर्वपक्षीय कृती समिती, राज्य इरिगेशन फेडरेशन,यांनी मंगळवारी महावितरणच्या जिल्ह्यासह राज्यातील सर्व कार्यालयांना टाळे ठोकणार असल्याचा इशारा १३ जुलैला झालेल्या आंदोलनावेळी दिला होता; पण शासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर संताप अनावर झालेल्या जनतेने महावितरणलाच टाळे ठोकून चार तासांहून अधिक काळ सर्व व्यवहार बंद पाडले.

आंदोलकांत रोष इतका होता की महावितरणचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांना स्वत: रस्त्यावर येत ठिय्या मारलेल्या आंदोलकांसमोर येऊन निवेदन स्वीकारावे लागले. हा राज्याच्या धोरणात्मक पातळीवरील निर्णय आहे, तरीदेखील वीज बिल भरले नाही म्हणून घरगुती, शेतीचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी ग्वाही दिली.दुपारी अकरा वाजता आंदोलन सुरू होणार होते, पण कर्मचारी आत गेले तर आंदोलनाची तीव्रता कळणार नाही म्हणून आंदोलकांनी सकाळी नऊ वाजता ताराबाई पार्कातील महावितरणचे कार्यालय गाठले आणि मुख्य गेटलाच कुलूप लावले. दुपारी आंदोलन होणार म्हणून पोलीसही गाफिल राहिले. दहा वाजता कर्मचारी येऊ लागले तसा गोंधळ वाढला.

पोलिसांनी धाव घेत कुलूप काढण्याचा प्रयत्न केला, यावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. अटक सत्र सुरू केल्यानंतर तर आंदोलक आधिकच आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांच्या वाहनांसमोरच ठिय्या मारला. कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन बाहेरच थांबविण्यात आले. चार तास हे कर्मचारी बाहेरच ताटकळतच राहिल्याने कार्यालयीन कामाचा पुरता बोजवारा उडाला.आंदोलनात मारुती पाटील, बाबासोा देवकर, बाबा पार्टे, भारत पाटील, चंद्रकांत पाटील, आर. के. पाटील, जयकुमार शिंदे, चंद्रकांत यादव, बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, आर. जी. तांबे, राजेंद्र पाटील, विशांत महापुरे, संदीप देसाई, सुभाष देसाई, संभाजीराज जगदाळे, सुभाष जाधव, अशोक पोवार, रमेश मोरे, सुभाष पाटील यांनी सहभाग घेतला. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूरMorchaमोर्चा