शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

मूठभर विरोधकांकडून सभा उधळण्याचा प्रयत्न - अरुण नरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:13 IST

(फोटो-०३०२२०२१-काेल- गोकुळ०२) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ने गेल्या वर्षभरात महापूर, कोरोना यांसारख्या संकटांना तोंड देत, दूध उत्पादक सभासदांच्या ...

(फोटो-०३०२२०२१-काेल- गोकुळ०२)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’ने गेल्या वर्षभरात महापूर, कोरोना यांसारख्या संकटांना तोंड देत, दूध उत्पादक सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले. मात्र मूठभर विरोधकांकडे ताळेबंदावर एकही प्रश्न नव्हता, स्टंट करायचा म्हणून त्यांच्याकडून सभा उधळण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप सभाध्यक्ष अरूण नरके यांनी बुधवारी केला.

‘गोकुळ’च्या सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नरके म्हणाले, सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील, असे सभेच्या सुरुवातीलाच आपण आवाहन केले असताना काही मंडळींना दंगा करायचा होता. संपूर्ण सभेत ताळेबंदावर एकही प्रश्न नव्हता. त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच नसल्याने जुन्या गोष्टींवर आग्रह धरणे योग्य नाही. जिल्ह्यातील दूध उत्पादक सुज्ञ आहेत.

संचालक बाळासाहेब खाडे म्हणाले, काटकसरीचा कारभार केल्यामुळेच संघाच्या २५० कोटींच्या ठेवी आहेत. भविष्यातील विचार करूनच विस्तारीकरण केले. त्यावेळी केले नसते तर आजचे १५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोठे करायची होती? मुद्दाच नसल्याने चांगल्या चाललेल्या दूध संघाच्या बदनामीचा उद्योग सुरू आहे. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, रणजितसिंह पाटील, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, उदय पाटील, सत्यजित पाटील, बाबा देसाई, अनुराधा पाटील, विलास कांबळे, रामराजे कुपेकर, अंबरीश घाटगे उपस्थित होते.

पिक्चर अभी बाकी है !

प्रसारमाध्यमांशी बोलताना सर्वच संचालक उपस्थित होते. यावर तीन संचालकांनी स्वतंत्र ठराव दाखल केल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. यावर, ‘पिक्चर अभी बाकी है,’ एवढीच प्रतिक्रिया अरुण डोंगळे यांनी दिली.

प्रवीणसिंहांकडे म्हैशी कोठे आहेत?

सभेनंतर बोलताना ‘बिद्री‘चे संचालक प्रवीणसिंह पाटील यांनी ‘गोकुळ’चे पशुखाद्य बनावट असून त्यामुळे २५ म्हैशी दगावल्या. हे प्रकरण मिटवण्यासाठी दहा हजार रुपये दिल्याचा आरोप केला. त्याबाबत विचारले असता, प्रवीणसिंहाकडे म्हैशी कोठे आहेत? अशी मिश्कील टिपणी रणजीतसिंह पाटील यांनी केली.

नरके यांच्याकडून घाणेकरांची पाठराखण

कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर हे ‘एनडीडीबी’चे सक्षम अधिकारी आहेत. त्यांच्यावर सर्व संचालकांचा विश्वास आहे. मात्र त्यांना काम तरी करू दिले पाहिजे, असे अरुण नरके यांनी सांगितले.