शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

विशाळगड जाळपोळ प्रकरण: दंगलखोरांना सोडले, मग पत्रकारांना का अडवता..? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 12:53 IST

गजापूरला जाण्यास विरोध : तासभर अडवल्याने पोलिसांशी वाद

कोल्हापूर : शनिवार-रविवार दोन दिवस दंगलखोर विशाळगडावर जात होते तेव्हा त्यांना कुणीच अडवले नाही आणि आता पत्रकार दंगलग्रस्त लोकांना भेटायला जात असताना तुम्ही का अडवता, अशी संतप्त विचारणा कोल्हापुरातील सर्वच माध्यम प्रतिनिधींनी मंगळवारी पोलिस व महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना केली. पांढरेपाणी येथे दुपारी त्यावरून सुमारे तासभर वाद झाला. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर पोलिसांच्या तीनच गाड्या गजापूरकडे सोडण्यात आल्या.दुपारी १२ वाजेच्या सुमारास इंडिया आघाडीचे नेते पांढरेपाणी येथे आल्यानंतर त्यांना पोलिसांनी अडवले. शाहूवाडीचे प्रांत समीर शिंगटे, पोलिस निरीक्षक विजय घेरडे, स्वाती गायकवाड यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त तिथे होता. प्रकरण संवेदनशील आहे आणि १४४ कलम लागू केल्याने तुम्हाला वर जाता येणार नाही, असे प्रांत शिंगटे यांनी सांगितले. त्यावर शाहू छत्रपतींनी मग दंगलखोर कसे गेले, रविवारी तुम्ही कुणाला असे अडवले होते का, अशी विचारणा केल्यावर ते निरुत्तर झाले. आम्ही लोकांशी संवाद साधायला निघालो आहे आणि जाणारच आहे, असे निक्षून सांगितले. आमदार सतेज पाटील यांनी तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून घ्या असे सुचवले. त्यानंतर प्रांत शिंगटे यांनी फोनवरून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी फक्त ५ लोकांनाच जाता येईल सांगितले. चर्चेतून १५ निवडक लोकांना जाण्याची परवानगी दिली. परंतु पत्रकारांना आम्ही सोडणार नाही..आम्हाला तसे वरून आदेश आहेत, असे सांगण्यात आले. परंतु हे ऐकायला पत्रकार तयार नव्हते. दंगलखोरांनी आमच्या पोटाला चाकू लावला तेव्हा तुम्ही कुठे होता.. घटनेचे व्हिडीओ साऱ्या देशभर व्हायरल झाले आणि आता आम्हाला का अडवता.. तुम्ही कसे अडवता ते अडवा म्हणून पत्रकार बॅरिकेड तोडून घुसले. त्यांना पोलिस अडवत होते. ही बाब इंडिया आघाडीच्या नेत्यांना समजल्यावर तुम्ही पत्रकारांना सोडणार नसाल तर आम्ही जाणार नाही, असा पवित्रा आर. के. पोवार, मेघा पानसरे, भारती पोवार, गिरीश फोंडे, सतीश कांबळे आदींनी घेतला. उदय नारकर यांनीही पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. तरीही पोलिस ऐकायला तयार नव्हते. मग प्रांत शिंगटे पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांशी बोलले. त्यांनी तीनच वाहने सोडणार अशी परवानगी दिली मग तासभर हुुज्जत घातल्यानंतर पत्रकारांना फक्त १५ मिनिटांत खाली निघून यायचे असे सांगत गजापूरकडे सोडण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसJournalistपत्रकार