शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
6
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
7
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
8
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
9
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
10
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
11
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
12
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
13
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
14
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
15
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
16
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
17
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
18
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
19
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
20
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
Daily Top 2Weekly Top 5

विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी ग्रामपंचायतींना मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:25 IST

कोल्हापूर : गावामध्ये विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी ग्रामपंचायतींना मान्यता देण्यात आली आहे. पंधराव्या वित्त आयोगातून ...

कोल्हापूर : गावामध्ये विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी ग्रामपंचायतींना मान्यता देण्यात आली आहे. पंधराव्या वित्त आयोगातून अबंधित प्राप्त निधीच्या २५ टक्क्यांच्या मर्यादेत खर्च करण्यास ग्रामविकास विभागाने मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील ग्रामपंचायतींसमोरील निधी खर्च करण्याची अडचण दूर होणार आहे.

राज्यातील अनेक पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांना घरात ठेवू नका, कारण त्यामुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याचे शासनाच्या निर्दशनास आले आहे. त्यामुळे रुग्णांच्या गृह अलगीकरणापेक्षा संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशा सूचना वारंवार दिल्या जात होत्या. कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या टास्क फोर्सनेही हेच निरीक्षण नोंदवले; परंतु अशा पद्धतीचे संस्थात्मक विलगीकरण करताना त्यासाठी लागणारा खर्च कसा करायचा हा प्रश्न ग्रामपंचायतींसमोर होता.

गतवर्षी कोरोनाच्या काळात ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन गावातील शाळांमध्ये संस्थात्म्क विलगीकरणाची सोय केली. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जेवणाच्या सोयीपासून अन्य सुविधा या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या ग्रामस्थांना पुरवल्या; परंतु सलग दुसऱ्या दिवशी आलेल्या या संकटामध्ये ती मानसिकता राहिलेली नाही. म्हणूनच संस्थात्मक विलगीकरणाला ग्रामीण भागातून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले.

यावर उपाय म्हणून आता ग्रामविकास विभागानेच पंधराव्या वित्त आयोगातील जो अबंधित निधी आहे, त्यातील २५ टक्के निधी हा संस्थात्मक विलगीकरणासाठी खर्च करण्याला परवानगी दिली आहे. सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींच्या वतीने विलगीकरण कक्ष उभारण्याचे नियोजन करावे, अशी सूचना ग्रामविकास विभागाने दिली आहे.

चौकट

कोल्हापुरात ५ मे रोजीच घेण्यात आला निर्णय

हाच निर्णय कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी घेतला होता. त्यांनी याबाबत तीन पानी पत्रक सर्व ग्रामपंचायतींना काढले होते. त्यामध्ये त्यांनी निधी कसा आणि कोणत्या बाबीवर खर्च करायचा आणि संस्थात्मक अलगीकरणाला प्राधान्य द्या, अशा सूचना चव्हाण यांनी केल्या होत्या.

कोट

गावागावामध्ये संस्थात्मक अलगीकरण करताना ग्रामपंचायतींना काही अडचणी येत होत्या. प्रामुख्याने निधीच्या खर्चाबाबत पदाधिकाऱ्यांचा काही शंका होत्या. म्हणूनच या कामासाठी पंधराव्या वित्त आयोगातून अबंधित निधीच्या २५ टक्क्यांच्या मर्यादेत खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हसन मुश्रीफ

ग्रामविकासमंत्री, महाराष्ट्र