शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

गडहिंग्लज कारखाना गैरव्यवहार प्रकरण: डॉक्टर प्रकाश शहापूरकर तुम्हीसुद्धा..!; सभासद, शेतकरी, कामगारांतून संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 15:25 IST

राम मगदूम गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याने अंतर्गत हिशेब तपासणी व मार्गदर्शनासाठी नेमलेल्या लेखापरीक्षकाकडूनच माजी ...

राम मगदूमगडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याने अंतर्गत हिशेब तपासणी व मार्गदर्शनासाठी नेमलेल्या लेखापरीक्षकाकडूनच माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्याविरुद्ध अपहार व नुकसान मिळून सुमारे ३० कोटीच्या गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलेल्या घटनेमुळे सभासदांसह शेतकरी, कामगारांतून ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’ अशा संतप्त प्रतिक्रया उमटत आहेत.१९७२ मध्ये संस्थापक आप्पासाहेब नलवडे व सहकाऱ्यांनी कारखान्याची मंजुरी आणली. परंतु, बहुसंख्य शेतकरी अल्प भू-धारक व कोरडवाहू शेतीमुळे भागभांडवल जमवताना दमछाक झाली. हजारो शेतकऱ्यांनी सोसाट्यांची कर्जे काढून शेअर्स घेतले. काटेवाल्या व्यापाऱ्यांसह अनेकांच्या मदतीमुळे कारखान्याचे स्वप्न सत्यात उतरले. अवघ्या ११ महिन्यात कारखान्याची उभारणी करून शासकीय भागभांडवल परत करण्याचा पराक्रम नलवडेंनी केला.

तथापि, श्रीपतराव शिंदे, बाबासाहेब कुपेकर, राजकुमार हत्तरकी यांनी एकत्र येऊन नलवडेंच्याकडून कारखान्याची सत्ता हस्तगत केली. तेंव्हापासून सुरू झालेल्या आघाड्यांच्या राजकारणामुळेच कारखान्याचे पुरते वाटोळे झाले. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शब्दावर विश्वास ठेवून सभासदांनी त्यांच्या नेतृत्वाखालील आघाडीकडे एकहाती सत्ता सोपवली. परंतु, शहापूरकरांच्या कृतीमुळे कारखान्याचे प्रवर्तक व शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला.

२०२२ मध्ये आर्थिक अडचणीमुळे कारखाना बंद राहिला. गेल्यावर्षी कारखान्याचे नक्तमूल्य उणे असतानाही मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेतून दिलेल्या ५५ कोटींच्या कर्जामुळे कारखाना सुरू झाला. ऊस, तोडणी-वाहतुकीच्या बिलांसाठी ४० लाखाचे साखर तारण कर्जही दिले. परंतु, शहापूरकरांनी कर्जाच्या विनियोगात बँकेचे नियम व सहकार कायद्यालाच बगल दिल्यामुळे ही नामुष्की त्यांच्यावर, पर्यायाने कारखान्यावर ओढवली.

दरम्यान, शहापूरकरांच्या मनमानीमुळे एका वर्षात तीन कार्यकारी संचालकांसह ८ खातेप्रमुखांनी राजीनामे दिले. त्यांच्याच सहकाऱ्यांनी साखर आयुक्तांसह जिल्हा बँकेकडे तक्रारी केल्या. सेवानिवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत यांनीही वेळोवेळी आवाज उठविला. त्यामुळे मुद्देनिहाय सखोल चौकशी व लेखापरीक्षणातून हा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. यापुढे पोलिस, सहकार खात्याची कारवाई व न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल.

राजीनाम्यानंतर फौजदारीची वेळ..!अहमदाबाद येथील तथाकथित स्वामी नारायण ट्रस्टकडून ३०० कोटींचे कर्ज आणण्यात झालेली दिरंगाई व थकीत पगारासाठी कामगारांनी संचालकांच्या घरावर काढलेल्या मोर्चामुळे ११ संचालकांनी सह्यांचे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे शहापूरकरांवर राजीनाम्याची नामुष्की आली. त्यानंतर फौजदारी कारवाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

संधी गमावली, नामुष्की आली..!एकेकाळी तालुक्यातील अभ्यासू, स्पष्ट वक्ते व पर्यायी नेतृत्व म्हणून शहापूरकरांकडे पाहिले जात होते. परंतु, केवळ स्वभावामुळे तब्बल २२ वर्षे ते कारखान्याच्या सत्तेपासून दूर होते. दोन वर्षांपूर्वी मुश्रीफांच्या सहकार्यामुळे त्यांच्याकडे कारखान्याची एकहाती सत्ता आली. मुश्रीफांचे पाठबळ असतानाही कारखान्याला गतवैभव देण्याची आणि स्वत:ला सिद्ध करण्याची संधी त्यांनी गमावली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी