शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन लष्करी अळीचा धुमाकूळ, कोल्हापूर  जिल्ह्यात १६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 18:19 IST

यावर्षी विचित्र हवामान परिस्थितीमुळे शेती आतबट्ट्यात असतानाच आता अमेरिकन लष्करी अळीने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मका, ज्वारी, ऊस या पिकांचा ही अळी फडशा पाडत आहे. पूर्णपणे पाने खात असल्याने पिकांच्या नुकसानीचे प्रमाण ७० टक्क्यांच्याही वर आहे.

ठळक मुद्देअमेरिकन लष्करी अळीचा धुमाकूळ, कोल्हापूर  जिल्ह्यात १६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसानकरवीर, पन्हाळा, कागल तालुक्यांत जास्त प्रादुर्भाव, शेतकऱ्यांची चिंता वाढली

कोल्हापूर : यावर्षी विचित्र हवामान परिस्थितीमुळे शेती आतबट्ट्यात असतानाच आता अमेरिकन लष्करी अळीने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मका, ज्वारी, ऊस या पिकांचा ही अळी फडशा पाडत आहे. पूर्णपणे पाने खात असल्याने पिकांच्या नुकसानीचे प्रमाण ७० टक्क्यांच्याही वर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे या अळीने नुकसान केले आहे.कोल्हापूर जिल्ह्यात या वर्षी अतिपावसामुळे पिकांवरील कीड रोगांचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत जास्त आहे. जास्त पाऊस आणि कमी सूर्यप्रकाशामुळे या अळ्यांचे प्रमाण वाढले. यात हुमणी, लोकरी मावा, तुडतुडे, गोगलगाय, सुरवंटासह पावसाळ्यातील किड्यांनी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. यात पाने खाणाऱ्या लष्करी अळीचाही समावेश होता. या वर्षी तर सलग पावसामुळे या अळीकडून होणाऱ्या नुकसानीच्या प्रमाणात वाढच झाली.

आता या अळीमध्ये अमेरिकन लष्करी अळीची नव्याने भर पडली आहे. गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यातील अतिपावसाच्या तालुक्यामध्ये अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाने केलेल्या पाहणीत आढळले आहे. विशेषत: कागल, करवीर, पन्हाळा या तीन तालुक्यांत या अळीने मका, ज्वारी, उसावर आक्रमण करून फडशा पाडल्याचे दिसत आहे. गडहिंग्लज, आजरा, चंदगड या ठिकाणीही या अळीने पिकांचे नुकसान केले आहे.ही अळी मुख्यत्वे मका पिकावर जास्त वाढते. पूर्ण पाने खाऊन ती बोंग्यातही शिरते. पाने कुरतडल्याने त्यांची जाळी तयार होउन पिकाची वाढ खुंटते. मका आणि ज्वारीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करणाऱ्या या अळीने आता नव्याने लागण झालेल्या उसाकडे मोर्चा वळविला आहे. ही अळी उसाच्या पानांचा फडशा पाडत आहे. आडसाली, पूर्वहंगामी लागणीमध्ये याचा प्रादुर्भाव दिसत आहे. आधीच लोकरी मावा आणि हुमणीमुळे ऊसपीक अडचणीत असताना, आता या अळीच्या प्रसारामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.

जिल्ह्यातील बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)करवीर (५५), कागल (५४), पन्हाळा (४०), गडहिंग्लज( १०), आजरा (०५), चंदगड (०४).

असे करा नियंत्रणकृषी सहायकांच्या मदतीने तातडीने यावर उपाययोजना सुचविल्या जात आहेत. कामगंध सापळ्याबरोबरच एकात्मिक किडी व्यवस्थापनसह क्लोरोअ‍ॅट्रानिलीप्रोल १८.५ एस.सी. अथवा नोमुरिया रिलेयी ४ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून मिसळून फवारणी केल्यास या किडीचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. तसेच या अळीचा प्रसार रोखण्यासाठी म्हणून या अळीचे नर पतंग पकडणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी फेरोमोन सापळे शेतात लावण्याविषयी कृषी विभागाकडून प्रात्यक्षिके दाखविली जात आहेत. 

या अळीच्या डोक्यावर उलटा ‘वाय’ आकाराचे चिन्ह दिसते आणि तिच्या शेवटच्या भागावर काळ्या रंगाचे चार ठिपके असतात. या वैशिष्ट्यावरून ही अळी ओळखता येते. या अळीची वाढ पूर्ण होण्यासाठी १५ ते १६ दिवस लागतात. पूर्ण वाढलेली अळी जमिनीत कोषावस्थेत जाते आणि सात ते आठ दिवसांतून त्यातून पतंग बाहेर पडतो. या किडीचा जीवनक्रम २५ ते ३० दिवसांत पूर्ण होतो. या पतंग आणि मादीच्या मिलनातून पुन्हा अंडीपुंज तयार होऊन एका पुंजातून सात ते आठ अळ्या तयार होतात. अशा प्रकारे या अळ्यांचा प्रसार वाढत जातो. त्यामुळे या धोकादायक अळीचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.पांडुरंग मोहिते, कीटकशास्त्रज्ञ, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर