शहरं
Join us  
Trending Stories
1
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
2
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
5
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
6
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
7
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
8
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
9
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
10
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
11
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
12
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
13
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
14
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
15
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
16
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
17
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
18
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
19
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
Daily Top 2Weekly Top 5

आंबेओहोळमुळे आजऱ्यातील हिरव्या पट्यात वाढ होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:17 IST

सदाशिव मोरे आजरा : डोंगराळ व खडकाळ असणाऱ्या आजरा तालुक्यात चित्रीसह अन्य मध्यम प्रकल्पांमुळे माळरानावर गेल्या १० वर्षांत हिरवं ...

सदाशिव मोरे

आजरा : डोंगराळ व खडकाळ असणाऱ्या आजरा तालुक्यात चित्रीसह अन्य मध्यम प्रकल्पांमुळे माळरानावर गेल्या १० वर्षांत हिरवं सोनं पिकण्यास सुरवात झाली आहे. आता आंबेओहोळ प्रकल्पामुळे उत्तूर परिसरातील अनेक गावे हिरव्या पट्यात येत आहेत. तालुक्यातील सर्फनाला, उचंगी हे प्रकल्पही अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे येत्या दोन वर्षांत आजरा तालुक्यातील काळ्या मातीला मुबलक पाणी मिळून सुजलाम-सुफलाम होणार आहे.

दहा वर्षांपूर्वी पावसाच्या पाण्यावर पिकवल्या जाणाऱ्या शेतीला आज चित्री, एरंडोळ, धनगरवाडी व खानापूर या धरणांमुळे पाणी मिळण्यास मदत झाली आहे. चित्रीचे पाणी अनेक शेतकऱ्यांनी हिरण्यकेशी नदीतून उचलून आपल्या शेतीला देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हिरण्यकेशी पट्यातील जमीन हिरवीगार झाली आहे.

अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनाही हिरण्यकेशी नदीवर असल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्याची पायपीट थांबली आहे. डोंगराळ व खडकाळ असणाऱ्या आजरा तालुक्याची वाटचाल प्रकल्पातील पाण्यामुळे नियोजनबद्ध विकासाकडे सुरू आहे.

शेतीला पाणी मिळत असल्याने उसाचे क्षेत्रही वाढले आहे. अनेक शेतकरी भाजीपाल्यासह उन्हाळी व कडधान्याची पिकेही घेत आहेत. धरणातील पाण्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. साखर कारखान्याच्या स्थापनेपासून उसाच्या बाबतीत परावलंबी असणारा आजरा कारखाना सध्या स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करीत आहे.

चालू वर्षी जवळपास ३ लाख टनपेक्षाही जास्त उसाचे उत्पादन होणार आहे. सर्फनाला व उचंगीच्या धरणांच्या पूर्णत्वानंतर जमिनीला मुबलक पाणी मिळण्यास मदत होणार आहे.

आजपर्यंत मागास व डोंगराळ असा असणारा शिक्का पुसून हिरवं सोनं पिकविण्याकडे शेतकऱ्याचा कल वाढला आहे.

..

चित्रीसह अन्य प्रकल्पामुळे १८९९ हेक्टर क्षेत्राला पाणी

पाटबंधारे विभागाच्या नोंदीनुसार चित्रीचे ९५४ हे., एरंडोळ १३८ हे., धनगरवाडी १३६ हे., उचंगी ८० हे., सर्फनाला ५९१ हे., असे १८९९ हे., जमिनीला पाणी दिले जाते. उचंगी व सर्फनाला प्रकल्प झाल्यानंतर यामध्ये वाढ होणार आहे.

तालुक्यातून ३४ लाखांची पाणीपट्टी वसुली

हिरव्या पट्यातील जमिनीसाठी हे. ११२२ रुपये, पाणीपट्टी व २० टक्के लोकल फंड तर हिरव्या पट्याच्या बाहेरील जमिनीसाठी १६८६ रुपये हेक्टरी पाणीपट्टी आकारली जाते. तालुक्यात चालू वर्षी पाटबंधारे विभागाने ३४ लाखांची पाणीपट्टी वसूल केली आहे.