शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

पन्हाळ्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू पुरातत्व विभागाकडुन बंद, पर्यटकांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 15:01 IST

ऐतिहासिक पन्हाळ गडावर पर्यटकांची गर्दी ही बारा महिने असतेच. सध्या नाताळ व सलग सुट्टीमुळे पन्हाळगड पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला आहे.

पन्हाळा- ऐतिहासिक पन्हाळ गडावर पर्यटकांची गर्दी ही बारा महिने असतेच. सध्या नाताळ व सलग सुट्टीमुळे पन्हाळगड पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला आहे.मात्र पन्हाळा येथे पुरातत्व विभागाने सज्जाकोठी, तीन दरवाजा, अंधारबाव, धान्याचे कोठार आदी महत्त्वाचे ऐतिहासिक वास्तू बंद केल्याने पर्यटकांना ऐन नाताळच्या सुट्टीतच ही ठिकाणे पाहता येत नसल्यामुळे आलेल्या पर्यटकांची निराशा झाली आहे.

कित्येक पर्यटकांनी यामुळे परतीचा रस्ता धरला आहे. अचानक झालेल्या पुरात्त्वविभागाच्या ऐतिहासिक वास्तू बंद करण्याच्या निर्यणामुळे  मात्र गडावर सर्वत्र निराशा पसरली आहे.

चौथा शनिवार,रविवार त्यातच आज सोमवारी नाताळ सणाची सुट्टी त्यामुळे गडावर या तीन दिवसात सुमारे 70हजार पर्यटकांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या प्रवासी कर व वाहन करात देखील मोठी वाढ झाली आहे.पन्हाळा येथील सर्वच ठिकाणे सलग सुट्टीमुळे गजबजुन गेली आहेत. तर काही परराज्यातील पर्यटकांनी सुट्टीमुळे पन्हाळा येथील हॉटेल्समध्ये मुक्काम ठोकला आहे. मात्र आज सकाळी पुरात्त्वविभागाने कोणतीही पूर्व कल्पना न देता अचानक  सज्जाकोठी,अंधारबाब,तीन दरवाजा,धान्याचे कोठार आदी ठिकाणे पर्यटकांना पहाण्यास बंद केल्याने पर्यटकांच्यात नाराजी पसरली आहे. अचानक ऐन सु्ट्टीच्या मोसमातच या पुरात्त्वविभागाच्या अधिकारी वियज चव्हाण यांनी ऐतिहासिक वास्तू बंद करण्याचा निर्यण नेमका का घेतला यांचे उत्तर अजूनही समजलेलं नाही. पन्हाळगडावर आज सकाळी झालेल्या या पुरात्त्वविभागाच्या मनमानी कारभारामुळे हैद्राबाद,कर्नाटक,गोवा,गुजरात,मध्यपद्रेश आदी परराज्यातील तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील पर्यटकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.तर तीन दरवाजा येथुनच तालुक्यातील पश्चिमभागाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे.तीन दरवाजा बंद झाल्याने यामार्गवरील वाहतुक अचनाक बंद करण्यात आली.त्यामुळे वाहनधाकाकांच्यातुन येथील पुरात्त्वविभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता की रस्ता बंद का केला तर कर्मचाऱ्याच्यांकडुन उद्धगिरीची भाषा वापरली जात होती.असे अनेक वाहनधारकांच्यातुन सांगितले आहे.या प्रकारामुळे मात्र पर्यटनावर वपरित परिणाम झाला आहे.पन्हाळगडाला गालबोट लागले आहे.

आम्ही मुंबईवरुन गेल्या तीन दिवासापासून पन्हाळगडावर एका हॉटेलमध्ये राहत आहेत.आज सकाळी तीन दरवाजा येथे गेलो असता तीन दरवाजा बंद करण्यात आल्याने आम्हाला तीन दरवाजा पाहता आले नाही. ऐतिहासिक वास्तुच पहाता आली नसल्याने पुरात्त्वविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी मुंबईहून आलेल्या मंगेश नायर यांनी केली.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूर