शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वच पक्षांचे सेनापती पराभूत

By admin | Updated: October 21, 2014 00:19 IST

विधानसभा निवडणूक : काँग्रेस, राष्ट्रवादीसह पाच पक्षांचे जिल्हाध्यक्ष घरी

कोल्हापूर : राज्यात उच्चांकी मतदान झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील निकाल धक्कादायक आहेत. प्रमुख राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष स्वत:चाही पराभव वाचवू शकले नाहीत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील या दोघांनी भोगावती साखर कारखान्याच्या राजकारणातून एकमेकांचा पराभव केला. राधानगरीत प्रस्थापितांविरुध्द लाटेचा फायदा घेण्यात स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील अपयशी ठरले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे व भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांचा मतदारसंघ बदलल्याने त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेस व युतीचा घटस्फोट झाल्यानंतर जिल्ह्यातील चित्र बदलले. दोन्ही काँग्रेस एकमेकांविरोधात लढली; पण करवीर व राधानगरी मतदारसंघांत वेगळीच समीकरणे उदयास आली. ‘भोगावती’च्या राजकारणामुळे के. पी. पाटील यांच्या विरोधात काँग्रेसची ताकद शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्या मागे उभी केली. के. पी. पाटील यांनी याच रागातून करवीरमधील राष्ट्रवादीची ताकद आमदार चंद्रदीप नरके यांच्या मागे उभी करून काटशहाचे राजकारण केले. एकमेकाला संपविण्याच्या नादात हे दोन्ही जिल्हाध्यक्ष स्वत:च संपले आणि त्याचा फायदा सेनेला झाला.स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष पाटील राधानगरीतून पराभूत झाले. गतवेळचे मतदानही त्यांना मिळाले नाही. या मतदारसंघात प्रस्थापितांविरोधात लाट होती. तिचा फायदा पाटील यांना घेता आला नाही. जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, तरीही त्यांना मतदारांनी स्वीकारले नाही. आबिटकर यांनी तडजोडीचे राजकारण करीत, ‘आता नाही तर कधीच नाही,’ असे म्हणून ताकद लावल्यामुळे ते यशस्वी झाले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना ऐनवेळी दक्षिण मतदारसंघातून उभे केले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून देवणे यांना ४८ हजार मते मिळाली होती. त्यामुळे त्यांनी ‘दक्षिण’मधून धाडस केले; पण मतदारांनी त्यांना नाकारले. अवघी ९०४८ मते मिळाली. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष जाधव यांनी गेली दोन वर्षे कोल्हापूर दक्षिणमधून तयारी केली होती; पण ऐनवेळी कोल्हापूर उत्तरमधून ते लढले. येथे त्यांनी चांगली लढत देत ४०,१४० मते घेतली. त्यामुळे पाच जिल्हाध्यक्षांचा पराभव झाला पी. एन. पाटील, के. पी. पाटील व प्रा. जालंदर पाटील या तीन पाटलांना आत्मचिंतन करायला लावणारा आहे. (प्रतिनिधी)