शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

मराठा आरक्षणाविषयी शासनाच्याच मनात पाल चुकचुकतेय : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 16:27 IST

शासनाने दिलेल्या मराठा आरक्षणाबद्दल सरकारच्या मनातच पाल चुकचुकते आहे. त्यामुळे न्यायालयात निष्णांत वकिलांची फौज उभी करू, असे सरकारमधीलच काही मंत्री सांगत आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री अजित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.

ठळक मुद्दे'मराठा आरक्षणाविषयी शासनाच्याच मनात पाल चुकचुकतेय' 'न्यायालयात निष्णांत वकिलांची फौज उभी करू म्हणणारे शासनच द्विधावस्थेत''धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजालाही आरक्षण दिले पाहिजे'

कोल्हापूर /इचलकरंजी : शासनाने दिलेल्या मराठा आरक्षणाबद्दलसरकारच्या मनातच पाल चुकचुकते आहे. त्यामुळे न्यायालयात निष्णांत वकिलांची फौज उभी करू, असे सरकारमधीलच काही मंत्री सांगत आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री अजित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.केंद्रात आणि राज्यात भाजपाचेच सरकार आहे. त्यामुळे मराठा आरक्षण कायमपणे टिकले पाहिजे, असा मसुदा करणे राज्य शासनाकडून अपेक्षित आहे. राज्यात लाखोंचे मोर्चे निघाल्यानंतर आम्हा सर्वांच्या एकमुखी पाठिंब्यावर शासनाने मराठा समाजाला एसईबीसी हे आरक्षण घोषित केले.

ते टिकविण्याचे शासनानेच काम आहे, असे सांगून पवार पुढे म्हणाले, ५२ टक्के आरक्षणाला धक्का न पोहचता शासनाने आता धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजालाही आरक्षण दिले पाहिजे.

...मग भाजपच ईव्हीएम बदला असे म्हणेल  : अजित पवार

काळजी करू नका, योग्य चिन्हांचे बटण दाबा मग भाजपच ईव्हीएम बदला असे म्हणेल, माझा ईव्हीएम मशीनवर विश्वास आहे, कर्नाटक , पंजाब आणि पाच राज्यांचे निकाल याच मशीनमधून आल्याचे माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले. 

अजित पवार हे इचलकरंजी येथील  बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाला आले होते, या समारंभात पवार यानी सरकारवर चौफेर टीका केली. सध्याचे सरकार शेतकरी विरोधात आहे, अशी टीका करून निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला राम, हनुमान आठवतो, असे पवार म्हणाले. 

मुख्यमंत्री, महसूल मंत्री, वस्त्रउद्योग मंत्री नुसता फसव्या घोषणा करतात. कसलीही कृती त्यांच्याकडून होत नाही, राज्यातील वस्त्रउद्योग धंद्याची या सरकारने वाट लावली आहे. केंद्रातले सरकार व राज्यातले सरकार हे फसवे आहे, असाही आरोप पवार यांनी केला.

काँगेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील यद्रावकर, उदय लोखंडे उपस्थित होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणGovernmentसरकारkolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवारDhangar Reservationधनगर आरक्षण