शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

शेतकऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या भाजपला सोडा, राष्ट्रवादीला साथ द्या : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 16:20 IST

शेतकऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या भाजपला सोडा, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे, ते दुरुस्त करण्यासाठी, रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या भाजपला सोडा, राष्ट्रवादीला साथ द्या : अजित पवारमुदाळ येथे राज्यव्यापी परिवर्तन निर्धार यात्रेत आवाहन

सरवडे/कोल्हापूर : शेतकऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या भाजपला सोडा, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे, ते दुरुस्त करण्यासाठी, रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी परिवर्तन निर्धार यात्रेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील, आदी उपस्थित होते.अजित पवार पुढे म्हणाले, हे सरकार शेतकरी विरोधी आहे. ऊसाची शेती हा धंदा आहे. भाजपाच्या मंत्री यांचे कारखाने आहेत मग एकरकमी एफआरपी नाही. मी मंत्री असताना तात्काळ निर्णय केला, आता का नाही. सहवीज प्रकल्प विज खरेदी दर ६ होता तो हे सरकार ४ रुपये करण्याच्या प्रयत्नात आहे. परदेशात साखर पाठवत नाही. शेतकºयांची नाडी ओळखणारा प्रतिनिधी पाठवा.महिलांवर अत्याचार होतो आहे. पोलिसांच्या खात्यातील महिलेवरच अत्याचार होत आहे. इंदिरा गांधी, प्रियंका गांधी कोण आहेत, हे जनतेला माहिती आहेत, मात्र त्यांचे गोत्र काढून नाहक दिशाभूल केली जात आहे, असा आरोपही अजित पवार यांनी यावेळी केला.स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंद केले, त्यांना शेकडो, कोटी रुपयांची आमिषे दाखवली. मात्र ते बधले नाहीत. मात्र, या भाजपने ही बंदी उठवली, हा आमच्या तरुणांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न ह सरकार करत आहे.आम्ही कारखानदारी आणली. तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला. कामगार, शेतकरी, महिला, तरुण या सरकारवर नाराज आहेत. सर्व घटकांचा भ्रमनिरास झाल्याने जनता भाजपची धुलाई करणार आहे हा विश्वास आहे.आम्ही जीएसटी १२ टक्के आणणार होतो यांनी २८ टक्के लादली. शिक्षित तरुण, तरुणीना नोकरी नाही.५४ वर्षात जेवढे कर्जे नव्हते तेवढे साडेचार वर्षात केले. जाहिरातीवर मात्र ५४ टक्के खर्च केला. हे सरकार राज्याला कंगाल बनवत आहे, अशी टीका पवार यांनी केली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर