शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतकऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या भाजपला सोडा, राष्ट्रवादीला साथ द्या : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 16:20 IST

शेतकऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या भाजपला सोडा, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे, ते दुरुस्त करण्यासाठी, रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या भाजपला सोडा, राष्ट्रवादीला साथ द्या : अजित पवारमुदाळ येथे राज्यव्यापी परिवर्तन निर्धार यात्रेत आवाहन

सरवडे/कोल्हापूर : शेतकऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या भाजपला सोडा, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे, ते दुरुस्त करण्यासाठी, रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी परिवर्तन निर्धार यात्रेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील, आदी उपस्थित होते.अजित पवार पुढे म्हणाले, हे सरकार शेतकरी विरोधी आहे. ऊसाची शेती हा धंदा आहे. भाजपाच्या मंत्री यांचे कारखाने आहेत मग एकरकमी एफआरपी नाही. मी मंत्री असताना तात्काळ निर्णय केला, आता का नाही. सहवीज प्रकल्प विज खरेदी दर ६ होता तो हे सरकार ४ रुपये करण्याच्या प्रयत्नात आहे. परदेशात साखर पाठवत नाही. शेतकºयांची नाडी ओळखणारा प्रतिनिधी पाठवा.महिलांवर अत्याचार होतो आहे. पोलिसांच्या खात्यातील महिलेवरच अत्याचार होत आहे. इंदिरा गांधी, प्रियंका गांधी कोण आहेत, हे जनतेला माहिती आहेत, मात्र त्यांचे गोत्र काढून नाहक दिशाभूल केली जात आहे, असा आरोपही अजित पवार यांनी यावेळी केला.स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंद केले, त्यांना शेकडो, कोटी रुपयांची आमिषे दाखवली. मात्र ते बधले नाहीत. मात्र, या भाजपने ही बंदी उठवली, हा आमच्या तरुणांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न ह सरकार करत आहे.आम्ही कारखानदारी आणली. तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला. कामगार, शेतकरी, महिला, तरुण या सरकारवर नाराज आहेत. सर्व घटकांचा भ्रमनिरास झाल्याने जनता भाजपची धुलाई करणार आहे हा विश्वास आहे.आम्ही जीएसटी १२ टक्के आणणार होतो यांनी २८ टक्के लादली. शिक्षित तरुण, तरुणीना नोकरी नाही.५४ वर्षात जेवढे कर्जे नव्हते तेवढे साडेचार वर्षात केले. जाहिरातीवर मात्र ५४ टक्के खर्च केला. हे सरकार राज्याला कंगाल बनवत आहे, अशी टीका पवार यांनी केली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर