शहरं
Join us  
Trending Stories
1
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
2
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
3
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
4
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
5
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
6
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
7
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
9
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
10
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
11
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
12
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
13
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
14
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
15
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
16
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
17
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
18
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
19
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
20
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या भाजपला सोडा, राष्ट्रवादीला साथ द्या : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 16:20 IST

शेतकऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या भाजपला सोडा, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे, ते दुरुस्त करण्यासाठी, रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या भाजपला सोडा, राष्ट्रवादीला साथ द्या : अजित पवारमुदाळ येथे राज्यव्यापी परिवर्तन निर्धार यात्रेत आवाहन

सरवडे/कोल्हापूर : शेतकऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या भाजपला सोडा, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे, ते दुरुस्त करण्यासाठी, रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी परिवर्तन निर्धार यात्रेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील, आदी उपस्थित होते.अजित पवार पुढे म्हणाले, हे सरकार शेतकरी विरोधी आहे. ऊसाची शेती हा धंदा आहे. भाजपाच्या मंत्री यांचे कारखाने आहेत मग एकरकमी एफआरपी नाही. मी मंत्री असताना तात्काळ निर्णय केला, आता का नाही. सहवीज प्रकल्प विज खरेदी दर ६ होता तो हे सरकार ४ रुपये करण्याच्या प्रयत्नात आहे. परदेशात साखर पाठवत नाही. शेतकºयांची नाडी ओळखणारा प्रतिनिधी पाठवा.महिलांवर अत्याचार होतो आहे. पोलिसांच्या खात्यातील महिलेवरच अत्याचार होत आहे. इंदिरा गांधी, प्रियंका गांधी कोण आहेत, हे जनतेला माहिती आहेत, मात्र त्यांचे गोत्र काढून नाहक दिशाभूल केली जात आहे, असा आरोपही अजित पवार यांनी यावेळी केला.स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंद केले, त्यांना शेकडो, कोटी रुपयांची आमिषे दाखवली. मात्र ते बधले नाहीत. मात्र, या भाजपने ही बंदी उठवली, हा आमच्या तरुणांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न ह सरकार करत आहे.आम्ही कारखानदारी आणली. तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला. कामगार, शेतकरी, महिला, तरुण या सरकारवर नाराज आहेत. सर्व घटकांचा भ्रमनिरास झाल्याने जनता भाजपची धुलाई करणार आहे हा विश्वास आहे.आम्ही जीएसटी १२ टक्के आणणार होतो यांनी २८ टक्के लादली. शिक्षित तरुण, तरुणीना नोकरी नाही.५४ वर्षात जेवढे कर्जे नव्हते तेवढे साडेचार वर्षात केले. जाहिरातीवर मात्र ५४ टक्के खर्च केला. हे सरकार राज्याला कंगाल बनवत आहे, अशी टीका पवार यांनी केली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर