शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सारे नेते विरुद्ध सामान्य शेतकरी-शेट्टींच्या लढ्याची पुण्याई : सत्यजित पाटील, कोरे गट विरोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 1:42 AM

शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात मागच्या दोन निवडणुकांप्रमाणेच सामान्य जनता एका बाजूला व झाडून सारे नेते एका बाजूला असेच चित्र दिसत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना दोन्ही वेळा या मतदारसंघाने

-राजाराम कांबळे

-शाहूवाडीशाहूवाडी विधानसभा मतदारसंघात मागच्या दोन निवडणुकांप्रमाणेच सामान्य जनता एका बाजूला व झाडून सारे नेते एका बाजूला असेच चित्र दिसत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना दोन्ही वेळा या मतदारसंघाने भरभरून साथ दिली. या मतदारसंघात संघटनेची फारशी बांधणी नाही; पण शेट्टी यांचा ऊस आणि दूध दरांसाठीचा संघर्ष हाच शाहूवाडीकरांचा झेंडा व तीच त्यांची जात आहे. त्यामुळे तीच लढ्याची पुण्याई घेऊन ते मैदानात आहेत.या मतदारसंघात शाहूवाडी पूर्ण तालुका व पन्हाळा तालुक्यातील ७४ गावे समाविष्ट आहेत. पन्हाळ्यापेक्षा शाहूवाडी तालुक्यातील मतदान सुमारे २० हजारांनी जास्त आहे. या मतदारसंघाचे आमदार सत्यजित पाटील हे शिवसेनेचे आहेत. त्यांचे विरोधी नेते विनय कोरे हे जनसुराज्य शक्ती पक्षाचे आहेत. शेट्टी यांच्याविरोधात आता तरी संभाव्य उमेदवार म्हणून शिवसेनेकडून धैर्यशील माने यांचे नाव चर्चेत आहे. कोरे यांचा या मतदारसंघात शिवसेनेशी झगडा आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच कोरे धनुष्यबाणाने घायाळ झाले आहेत. त्यांना धैर्यशील माने यांचा प्रचार करण्यात अडचणी नाहीत; परंतु एप्रिलमध्ये ‘धनुष्यबाणाला विजयी करा’ म्हणायचे आणि विधानसभेला लगेच त्याच ‘धनुष्यबाणाचा पाडाव करा,’ असा प्रचार कसा करायचा असे धर्मसंकट त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे ही जागा भाजपला देऊन तेथून कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना मैदानात उतरविण्याच्या हालचाली कोरे यांच्याकडून सुरू आहेत. मात्र येथील उमेदवारी बदलण्याची शक्यता फारच धूसर वाटते.शाहूवाडी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेना व कोरे गटाचे आहेत. पन्हाळा तालुक्यात कोरे गटाकडे सर्व महत्त्वाच्या सत्ता आहेत. त्यांची या तालुक्याच्या राजकारणावर चांगली मांड आहे. जिल्हा बँक व जिल्हा परिषदेत कोरे गटाचे शिलेदार सर्जेराव पाटील पेरीडकर हे सत्तेत आहेत. या मतदारसंघातील सत्तेचे एकही पद शेट्टी यांच्याकडे नाही. शाहूवाडी तालुक्यात तर त्यांच्या संघटनेचा झेंडा कुठे दिसत नाही; परंतु तरीही सामान्य शेतकरी त्यांच्या पाठीशी आहे. तोच त्यांची प्रचारयंत्रणा सांभाळतो. त्याला दुखवले तर विधानसभेला त्रास होईल म्हणून नेते लोकसभेला त्याच्यावर फारसा दबाव टाकत नाहीत; परंतु या वेळेला शेट्टी यांचा पराभव करण्यासाठी भाजप व कोरेही जास्त आग्रही आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वाकडूनही आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मते मिळायला हवीत, असा दबाव येण्याची शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीशी सूत जुळले तरी या दोन पक्षांचे नेते शेट्टी यांच्या प्रचारासाठी रान करतील, अशी चिन्हे नाहीत. या दोन्ही पक्षांची ताकदही मर्यादित आहे. कोरे व शेट्टी हा झगडा कारखानदार विरुद्ध शेतकरी संघटना असा आहे. त्यामुळे शेट्टींच्या पराभवासाठी कोरे जेवढ्या ताकदीने उतरतील, तेवढे शेट्टी यांचे मताधिक्य वाढते, या इतिहासाची यंदा पुनरावृत्ती होईल. शेट्टी यांनी मतदाराच्या लक्षात राहण्यासारखे काम केलेले नाही. बांबवडे येथे राईस मिलची घोषणा केली होती, तेसुद्धा काम पूर्ण नाही. चालू वर्षात उसाची बिले मिळालेली नाहीत. सदाभाऊ खोत यांनी सर्वच गटांच्या नेत्यांना विकासकामांचे वाटप केले आहे. त्यामुळे शेट्टी यांना मतांसाठी झगडावे लागणार हेसुद्धा तितकेच खरे आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण