शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन संपल्यानंतर कोल्हापुरातून मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी पडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:26 IST

कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत अद्याप राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल केलेली नाही. राज्य मागासवर्गीय आयोग नेमलेला नाही. निव्वळ घोषणा ...

कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत अद्याप राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल केलेली नाही. राज्य मागासवर्गीय आयोग नेमलेला नाही. निव्वळ घोषणा केल्या जात आहेत. आम्ही कोणतेही निर्णय घेतले, तरी मराठा समाज काहीच करू शकत नाही, असा सरकारचा समज झाला आहे. त्यामुळे आता मराठा समाजाने आपली ताकद दाखविण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी कोल्हापुरातून पडणार असल्याचे शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

आरक्षणाचे जनक असणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज माझे पणजोबा आहेत. त्यामुळे एक मराठा म्हणून सरकारला प्रश्न विचारतो की, आम्ही भीक की, खैरात मागतोय का? आरक्षण आमचा अधिकार, हक्क आहे. जे आरक्षण आम्हाला मिळाले होते. ते या सरकारने घालविले आहे. पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार काहीच पाऊल उचलत नाही. त्यामुळे आता मराठा काय आहे. आपली ताकद काय आहे ते सरकारला दाखविण्यासाठी मराठा समाज एकत्र यावे. पुन्हा लढा उभा करावा. आरक्षणासाठीच्या लढ्याची ठिणगी लॉकडाऊन संपल्यानंतर कोल्हापुरातून पडेल. या लढ्याकरिता समाजाला संघटित करण्यासाठी एक मराठा म्हणून मी आवश्यक ती सर्व पाऊल उचलणार आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहे. मराठा समाजातील बांधव, युवकांना भेटणार आहे. विविध संघटनांशी समन्वय साधून त्यांना एकत्रित करणार आहे. आरक्षण देण्याबाबत पुढील पाऊलं उचलण्यासाठी सरकारला भाग पाडले जाईल, असे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.

चौकट

मराठा समाजाने नेतृत्व करायचे

आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व हे मराठा समाजाने करायचे आहे. गेल्यावेळी ५८ मोर्चे काढले म्हणून आपल्याला आरक्षण मिळाले. त्यावेळी सामान्य मराठा म्हणून क्रांती मोर्चामध्ये सहभागी झालो. मी पहिल्यांदा मराठा असून आणि नंतर पक्षाचा पदाधिकारी आहे. त्याप्रमाणे सर्वांनी एकत्र यावे. पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून एक मराठा म्हणून मी या लढ्यात सामील होणार आहे. ही भूमिका मी मुंबईत झालेल्या भाजपच्या बैठकीत स्पष्ट केली असल्याचे घाटगे यांनी सांगितले.

समरजितसिंह घाटगे म्हणाले

मराठा समाजाला गृहित धरून आरक्षणाबाबत राज्य सरकार हलगर्जीपणाने निर्णय घेत आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही नाही, तर सत्ताधारी राजकारण करत आहेत.

पुढच्या पिढीसाठी आता आपण सर्वांनी पक्ष, गट-तट सोडून एकत्र यावे.

आरक्षण घेतल्याशिवाय आता स्वास्थ बसायचे नाही.

राज्याला दिशा देणारे आंदोलन हे कोल्हापूरने उभारले पाहिजे.