शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

‘अब्बा, मंै तो कलेक्टर बन गया’

By admin | Updated: June 25, 2016 00:41 IST

अन्सार शेख यांनी उलगडला यशाचा प्रवास

आयुब मुल्ला -- खोची --निकाल पाहण्यासाठी नेट कॅफेमध्ये गेलो. बराच वेळ तेथे थांबून राहिलो. अखेर सायंकाळी तेथून बाहेर पडलो. काही वेळातच मित्राचा फोन आला तू यशस्वी झालास अन् मी माझ्या खिशातला साधा किपॅडचा फोन काढला अन् फोनवरून म्हणालो, ‘अब्बा, मैं कलेक्टर बन गया! रिक्षा चला रहा हूँ, सुनाई नही आता और एक बार बोलो क्या हुआ? अब्बा मैं कलेक्टर बन गया!’ यूपीएससीत यशस्वी झालेल्या अन्सार शेख यांनी अशी माहिती पहिल्यांदा आपल्या वडिलांना सांगितली. त्याच अन्सार यांनी आपला यशस्वी प्रवास सांगताना हे संवादाचे व वाटचालीचे वर्णन वास्तवपणे मांडले. पाय ठेवायलाही जागा नसणारे सभागृह खचाखच भरले होते. त्यांच्या या यशाच्या संवादाला सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. युनिक अकॅडमीच्यावतीने शुक्रवारी सकाळी आय.ए.एस. झालेले अन्सार शेख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपला यशाचा मार्ग सांगितला. केशवराव भोसले नाट्यगृह विद्यार्थ्यांच्या गर्दीने खचाखच भरले होते. अन्सार शेख यांच्या आतापर्यंतच्या यशाला प्रतिकूलतेचे अनेक कंगोेरे आहेत. आपला प्रवास उलगडताना त्यांनी सांगितलेले किस्से मनाचा ठाव घेणारे आहेत. वडील रिक्षा चालविणारे, आई मजुरी करणारी, दोन बहिणी, एक लहान भाऊ असे कुटुंब. घरात शिकलेले कोणीही नव्हते. चौथीतून शाळा बंद करण्याचा निर्णय वडिलांनी घेतला होता; पण माझ्या गुणवत्तेची खात्री शाळेतील गुरुजींनी वडिलांना दिली. दहावीला ७६ टक्के गुण मिळाले. अकरावी-बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो; पण हे होत असताना अंधकारमय व शोषित कुटुंबात जीवन जगल्याच्या वेदना टोचत होत्या. मी सातवीत असतानाच परिस्थितीच्या दबावामुळे आई मनोरुग्ण झाली. ही तर माझ्यावर दडपणाचा आघात करणारी घटना होती. मी डगमगलो नाही. पुण्यात आलो. नोकरी करीत आर्टस्मधून ग्रॅज्युएट झालो.दोन-तीन मित्रांनी पुस्तके घेण्यासाठी पैसे दिले. खर्चालाही सतत मदत केली. युनिकचे तुकाराम जाधव यांचे उत्तम मार्गदर्शन मिळाले. सर्व परीक्षांचा अभ्यास नियोजनपूर्वक केला व पास झालो. पुण्यासारख्या श्रीमंत कुटुंबीयांच्या मुलामुलींचे स्टँडर्ड अन् माझी गरिबी याची मी तुलना केली नाही. माझ्या प्रत्येक पावलांवर अंधार, संघर्ष होता; पण त्यातून मला प्रकाशाची वाट दिली ती शिक्षणाच्या आत्मविश्वासाने. त्यामुळे वयाच्या २१ व्या वर्षी मी कलेक्टर झालो. यशस्वी होण्यासाठी स्पर्धा स्वत:च्या दुर्गुणाशी करा, अभ्यासात सातत्य ठेवा, संयमी राहा, सकारात्मक विचार करा, प्रचंड मेहनत करून इच्छाशक्ती बाळगा, टार्गेटवरच फोकस करा, श्रद्घा ठेवा, असाही सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. झोपडपट्टीत राहणारे अन्सार शेख इतके दिलखुलास वास्तव मांडत गेले अन् गर्दीने भरलेल्या नाट्यगृहात प्रेरणादायी वातावरण तयार होऊन यशस्वी वाटचालीस टाळ्यांचा कडकडाट होत प्रतिसाद मिळाला.शेळगाव (जि. जालना) या ग्रामीण बाज असलेल्या मागासपणाच्या छायेत असणाऱ्या गावातील अन् दारिद्र्यरेषेखाली गरीब कुटुंबात जन्मलेल्या अन्सार यांचा यावर्षीच्या यूपीएससीतील लक्षवेधी चेहरा ठरला आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी त्याचे केडर जाहीर झाले. राज्यात मराठी माध्यमातून व वयाच्या एकविसाव्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात ते एकमेव यशस्वी ठरले आहेत. ४वडिलांना घरकुलासाठी ३० हजार रुपये मंजूर झाले होते. ते मिळविण्यासाठी लाच द्यावी लागली, असे मला वडिलांनी सांगितले. तेव्हाच मी ठरविले. मोठा अधिकारी बनून गरिबांना न्याय देणारी सेवा करायची. यादृष्टीने प्रयत्न केले.