शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
3
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
4
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
5
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
6
’सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी तीन लाख घेत आहेत’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
7
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
8
रिलेशिनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले गौरव कपूर-कृतिका कामरा, व्हिडीओ व्हायरल
9
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
10
Gujarat Flyover Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला! ४ कामगार गंभीर जखमी, एक बेपत्ता
11
"माझ्या एका सिगारेटने दिल्लीच्या प्रदूषणात फरक पडणार नाही"; TMC खासदाराचं भाजपाला प्रत्युत्तर
12
Rahul Gandhi: "लाखो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे" लोकसभेत राहुल गांधींचं महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य!
13
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
14
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
15
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
16
"ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले’’,  हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
18
या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
19
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
20
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पंचगंगा प्रदूषण प्रश्नी पर्यावरण मंत्र्यांकडून दखल, उद्या विशेष बैठकीचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 16:57 IST

कुरुंदवाड : पंचगंगा नदीला शहरातील व औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे पंचगंगा नदी गटारगंगा बनली असल्याने व ...

कुरुंदवाड : पंचगंगा नदीला शहरातील व औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे पंचगंगा नदी गटारगंगा बनली असल्याने व लोकमतने नदी प्रदूषणावर वारंवार आवाज उठविल्याने आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी हा प्रश्न विधानसभा अधिवेशनात उपस्थित केला. त्यामुळे याची दखल घेतली असून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी ७ मार्च रोजी विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे या बैठकीतील निर्णयाकडे शिरोळ तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

पंचगंगा नदीपात्रात कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका सांडपाणी व औद्योगिक वसाहतीत सांडपाणी विनाप्रक्रिया नदीपात्रात सोडले जात असल्याने पंचगंगा नदी प्रदूषित झाली आहे. या नदीवरील बंधारा दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पाटबंधारा विभागाने धरणातील पाण्याचा विसर्ग रोखला आहे. परिणामी शहर व औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी नदीपात्रात येत असल्याने पंचगंगा नदी गटारगंगा बनली आहे.दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय प्रदूषित पाण्यामुळे शेतीही नापीक होत आहे. त्यामुळे नदी प्रदूषणाबाबत लोकमतने वारंवार आवाज उठविल्याने व वस्तुस्थिती आणि नागरिकांचा रोष ओळखून आमदार यड्रावकर यांनी विधानसभा अधिवेशनात हा विषय लावून धरला व नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्याची मागणी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पर्यावरणमंत्री मुंडे यांनी या विषयावर सविस्तर चर्चा करुन ठोस निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी (दि. ७) विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीला पर्यावरण विभाग, जलसंपदा विभाग व स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याने या बैठकीतील निर्णयाकडे शिरोळ तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रदूषणामुळे जीवन धोक्यातप्रदूषित पाण्यामुळे नदीकाठच्या लोकांना त्वचारोगांसह विविध आजारांचे लागण होत आहे. शिवाय रसायनयुक्त पाण्यामुळे शेतजमिनीवर विपरित परिणाम होऊन नापिक बनत आहे. या नदीपात्रात मच्छीमार करुन जगणारे बागडी समाज मोठ्या प्रमाणात आहे. मात्र प्रदूषित पाण्यामुळे सर्वच घटकांचे जीवन धोक्यात आले आहे.

नागरिकांच्या आशा पल्लवितपंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न प्रत्येक लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकीत चर्चेला येतो. निवडून आल्यानंतर प्रत्येक लोकप्रतिनिधींकडून या ज्वलंत प्रश्नाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याने पंचगंगा काठच्या नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र आमदार यड्रावकर यांनी या प्रश्नावर कितपत आग्रही राहतात यावरच या प्रश्नांची निर्गत होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषणPankaja Mundeपंकजा मुंडेministerमंत्री