शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

Kolhapur: पंचगंगा प्रदूषण प्रश्नी पर्यावरण मंत्र्यांकडून दखल, उद्या विशेष बैठकीचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 16:57 IST

कुरुंदवाड : पंचगंगा नदीला शहरातील व औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे पंचगंगा नदी गटारगंगा बनली असल्याने व ...

कुरुंदवाड : पंचगंगा नदीला शहरातील व औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे पंचगंगा नदी गटारगंगा बनली असल्याने व लोकमतने नदी प्रदूषणावर वारंवार आवाज उठविल्याने आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी हा प्रश्न विधानसभा अधिवेशनात उपस्थित केला. त्यामुळे याची दखल घेतली असून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी ७ मार्च रोजी विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे या बैठकीतील निर्णयाकडे शिरोळ तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

पंचगंगा नदीपात्रात कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका सांडपाणी व औद्योगिक वसाहतीत सांडपाणी विनाप्रक्रिया नदीपात्रात सोडले जात असल्याने पंचगंगा नदी प्रदूषित झाली आहे. या नदीवरील बंधारा दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पाटबंधारा विभागाने धरणातील पाण्याचा विसर्ग रोखला आहे. परिणामी शहर व औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी नदीपात्रात येत असल्याने पंचगंगा नदी गटारगंगा बनली आहे.दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय प्रदूषित पाण्यामुळे शेतीही नापीक होत आहे. त्यामुळे नदी प्रदूषणाबाबत लोकमतने वारंवार आवाज उठविल्याने व वस्तुस्थिती आणि नागरिकांचा रोष ओळखून आमदार यड्रावकर यांनी विधानसभा अधिवेशनात हा विषय लावून धरला व नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्याची मागणी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पर्यावरणमंत्री मुंडे यांनी या विषयावर सविस्तर चर्चा करुन ठोस निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी (दि. ७) विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीला पर्यावरण विभाग, जलसंपदा विभाग व स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याने या बैठकीतील निर्णयाकडे शिरोळ तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रदूषणामुळे जीवन धोक्यातप्रदूषित पाण्यामुळे नदीकाठच्या लोकांना त्वचारोगांसह विविध आजारांचे लागण होत आहे. शिवाय रसायनयुक्त पाण्यामुळे शेतजमिनीवर विपरित परिणाम होऊन नापिक बनत आहे. या नदीपात्रात मच्छीमार करुन जगणारे बागडी समाज मोठ्या प्रमाणात आहे. मात्र प्रदूषित पाण्यामुळे सर्वच घटकांचे जीवन धोक्यात आले आहे.

नागरिकांच्या आशा पल्लवितपंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न प्रत्येक लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकीत चर्चेला येतो. निवडून आल्यानंतर प्रत्येक लोकप्रतिनिधींकडून या ज्वलंत प्रश्नाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याने पंचगंगा काठच्या नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र आमदार यड्रावकर यांनी या प्रश्नावर कितपत आग्रही राहतात यावरच या प्रश्नांची निर्गत होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषणPankaja Mundeपंकजा मुंडेministerमंत्री