शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Kolhapur: पंचगंगा प्रदूषण प्रश्नी पर्यावरण मंत्र्यांकडून दखल, उद्या विशेष बैठकीचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 16:57 IST

कुरुंदवाड : पंचगंगा नदीला शहरातील व औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे पंचगंगा नदी गटारगंगा बनली असल्याने व ...

कुरुंदवाड : पंचगंगा नदीला शहरातील व औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे पंचगंगा नदी गटारगंगा बनली असल्याने व लोकमतने नदी प्रदूषणावर वारंवार आवाज उठविल्याने आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी हा प्रश्न विधानसभा अधिवेशनात उपस्थित केला. त्यामुळे याची दखल घेतली असून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी ७ मार्च रोजी विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे या बैठकीतील निर्णयाकडे शिरोळ तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

पंचगंगा नदीपात्रात कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका सांडपाणी व औद्योगिक वसाहतीत सांडपाणी विनाप्रक्रिया नदीपात्रात सोडले जात असल्याने पंचगंगा नदी प्रदूषित झाली आहे. या नदीवरील बंधारा दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पाटबंधारा विभागाने धरणातील पाण्याचा विसर्ग रोखला आहे. परिणामी शहर व औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी नदीपात्रात येत असल्याने पंचगंगा नदी गटारगंगा बनली आहे.दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय प्रदूषित पाण्यामुळे शेतीही नापीक होत आहे. त्यामुळे नदी प्रदूषणाबाबत लोकमतने वारंवार आवाज उठविल्याने व वस्तुस्थिती आणि नागरिकांचा रोष ओळखून आमदार यड्रावकर यांनी विधानसभा अधिवेशनात हा विषय लावून धरला व नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्याची मागणी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पर्यावरणमंत्री मुंडे यांनी या विषयावर सविस्तर चर्चा करुन ठोस निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी (दि. ७) विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीला पर्यावरण विभाग, जलसंपदा विभाग व स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याने या बैठकीतील निर्णयाकडे शिरोळ तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रदूषणामुळे जीवन धोक्यातप्रदूषित पाण्यामुळे नदीकाठच्या लोकांना त्वचारोगांसह विविध आजारांचे लागण होत आहे. शिवाय रसायनयुक्त पाण्यामुळे शेतजमिनीवर विपरित परिणाम होऊन नापिक बनत आहे. या नदीपात्रात मच्छीमार करुन जगणारे बागडी समाज मोठ्या प्रमाणात आहे. मात्र प्रदूषित पाण्यामुळे सर्वच घटकांचे जीवन धोक्यात आले आहे.

नागरिकांच्या आशा पल्लवितपंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न प्रत्येक लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकीत चर्चेला येतो. निवडून आल्यानंतर प्रत्येक लोकप्रतिनिधींकडून या ज्वलंत प्रश्नाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याने पंचगंगा काठच्या नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र आमदार यड्रावकर यांनी या प्रश्नावर कितपत आग्रही राहतात यावरच या प्रश्नांची निर्गत होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषणPankaja Mundeपंकजा मुंडेministerमंत्री