शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

Kolhapur: भरधाव दुचाकीची संरक्षक कठड्याला धडक, शालेय विद्यार्थी जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 13:21 IST

एकुलत्या मुलाच्या जाण्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

शिरगाव : ज्याच्याकडे बघूनच आई-वडिलांचे पोट भरू शकेल, असा एकुलता देखणा मुलगा मोरीच्या संरक्षक कठड्याला मोटारसायकलची जोरात धडक बसल्याने झालेल्या अपघातात शुक्रवारी सकाळी जागीच ठार झाला. अभिनव शरद गौड (वय १६, रा. शिरगाव) असे त्याचे नाव आहे. राशिवडे खुर्द ते पुंगावदरम्यान मठाचे शेताजवळ हा अपघात झाला.तोंडावर आलेल्या दहावी परीक्षेच्या आधीच विद्यार्थ्याच्या मृत्यूने गौड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या पश्चात आई, वडील, आजी-आजोबा, चुलते, पुतणे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, रविवारी (दि.२) आहे.याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अभिनव कामानिमित्त नातेवाइकांकडे मोटारसायकलवरून पुंगावला निघाला होता. राशिवडे खुर्द बेले ते पुंगाव दरम्यान मठाचे शेत नावाच्या मोरीच्या संरक्षक कठड्याला मोटारसायकलची जोरात धडक बसल्याने तो गाडीवरून दूर फेकला गेला. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.                        अभिनव हा सरवडे येथील किसनराव मोरे हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होता. त्याचा गावातही मोठा मित्रपरिवार होता. त्याच्या अचानक जाण्याने गाव हळहळला. गोपाळ बुवा व्यापारी मंडळाच्या व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून त्याला श्रद्धांजली वाहिली. अभिनव याचे वडील शरद गौड हे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. घटनेची फिर्याद निखिल तानाजी गौड यांनी दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल मोरे करत आहेत.

आईने फोडला हंबरडा..अभिनव याला चांगले शिकवून अधिकारी करण्यासाठी आई-वडिलांनी फक्त एका मुलावरच शस्त्रक्रिया केली. त्याच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. तो बाहेर जाताना घरी आईला सांगून जात होता. आईने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला, पण लगेचच येतो म्हणून गेलेल्या अभिनवचे पार्थिवच पाहण्याची वेळ आली. त्यामुळे आईने फोडलेला हंबरडा काळीज चिरत गेला.

दु:खाला पारावर राहिला नाही..गौड परिवारातील अनेक पै-पाहुणे परिसरात आहेत. अभिनवचा अपघातात मृत्यू झाल्याचे समजताच सारेजण शिरगावला आले. पार्थिव घरी आणल्यानंतर साऱ्यांचाच अश्रूंचा बांध फुटला. जो तो एकमेकांना धीर देत होता. आजोबा-आज्जीची स्थिती तर केविलवाणी झाली. त्यांना शब्द फुटत नव्हते. कुणाच्याच दु:खाला पारावर राहिला नव्हता..

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यूStudentविद्यार्थी