शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

कोल्हापुरातील ६ हजार नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत, जिल्हा प्रशासनाची पावणेचार कोटींची मागणी

By भीमगोंड देसाई | Updated: December 17, 2022 13:25 IST

जुलै, ऑगस्ट महिन्यातील नुकसानग्रस्तांना मदत

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे ५ हजार ८६२ शेतकऱ्यांचे १९२८ हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३ कोटी ७६ लाख ९५ रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. हा निधी मिळाल्यानंतर नव्या दरानुसार भरपाईची रक्कम वाटप करण्यात येणार आहे. मात्र नुकसान होऊन दोन महिने झाले तरी भरपाईची रक्कम न मिळाल्याने संबंधित शेतकरी प्रतीक्षेतच आहेत.अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या महसूल विभागातर्फे भरपाई दिली जाते. यंदाच्या जुलै, ऑगस्टमधील अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत जिरायत पिकांच्या नुकसानीपोटी प्रतिहेक्टर १३ हजार ६०० रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीपोटी प्रतिहेक्टरी २७ हजार, फळबागांच्या नुकसानीपोटी प्रतिहेक्टरी ३६ हजार रुपयांप्रमाणे भरपाई देण्यात आली आहे. जास्त पावसामुळे सप्टेंबरमध्ये पिकांचे नुकसान झालेले नाही. मात्र ऑक्टोबरमधील परतीच्या जोरदार पावसामुळे विविध पिकांना फटका बसला. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले.

सर्वाधिक शिरोळ तालुक्यातीलऑक्टोबरमधील पावसाने विविध पिकांचे झालेले नुकसानीचे क्षेत्र हेक्टरमध्ये आणि कंसात नुकसानभरपाईपोटी शासनाकडे मागणीचा निधी असा : करवीर : ५९.७७ (१२ लाख ५५ हजार), राधानगरी : ६.५२ (९१ हजार), पन्हाळा : १०६.९० (२२ लाख १० हजार), शाहूवाडी : १३ (१ लाख ७७ हजार), हातकणंगले : ४२७.८४ (६५ लाख ४७ हजार), शिरोळ : १३१३.६५ (२ कोटी ७४ लाख), भुदरगड : ०.४६ (८ हजार).

जुलै, ऑगस्ट महिन्यातील नुकसानग्रस्तांना मदतजुलै महिन्यात अतिवृष्टीने ३६२ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यांना ९ लाख ९३ हजार रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. ऑगस्टमधील अतिवृष्टीने २५० शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यांना भरपाईपोटी ६० लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

जास्त पावसाच्या तालुक्यात शून्य नुकसानगगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो. पण ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसाने या तालुक्यात एकाही शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान झाल्याची नोंद महसूल प्रशासनाकडे नाही. यासह चंदगड, आजरा, गडहिंग्लज, कागल तालुक्यातील शेतकऱ्यांचेही नुकसान झालेले नाही, असे शासनाच्या अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी