शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

मृत्यूची भीती तरी ऐन तारुण्यात आत्महत्या का वाढल्या?; कोल्हापूर जिल्ह्यात आठ महिन्यांत ३५० जणांनी आयुष्य संपवले 

By उद्धव गोडसे | Updated: September 13, 2024 15:39 IST

उद्धव गोडसे कोल्हापूर : अपयश, नैराश्य, अपेक्षाभंग आणि नकारात्मक मानसिकतेमुळे आयुष्यापासून पळ काढणाऱ्यांची संख्या वाढत आहे. किरकोळ कारणातून थेट ...

उद्धव गोडसेकोल्हापूर : अपयश, नैराश्य, अपेक्षाभंग आणि नकारात्मक मानसिकतेमुळे आयुष्यापासून पळ काढणाऱ्यांची संख्या वाढत आहे. किरकोळ कारणातून थेट तणनाशक प्राशन करणे आणि गळफास घेण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषत: आयुष्याला आव्हान देऊन जिद्दीने उभे राहण्याची क्षमता असलेली तरुणाईच क्षुल्लक कारणातून आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यात ३५० जणांनी आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले. अलीकडे आत्महत्यांची संख्या वाढत असल्याने ही नवी सामाजिक समस्या बनत आहे.आठ महिन्यांत ३५० आत्महत्याजिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत ३५० जणांनी आत्महत्या केल्याची नोंद सीपीआरमध्ये झाली. ग्रामीण भागात तणनाशक प्राशन करून, तर शहरी भागात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. यात तरुणांची संख्या चिंताजनक आहे.

आत्महत्येची प्रमुख कारणे काय?प्रेमभंग : प्रेमात अपयश आले. ऐनवेळी लग्नाला किंवा प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. नातेवाइकांनी प्रेम विवाहास विरोध केल्याच्या कारणातून तरुणांच्या आत्महत्या होतात. विशेष म्हणजे यात तारुण्याच्या उंबरठ्यावरील अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.अपेक्षाभंग : २० ते ४० वयोगटातील बहुतांश व्यक्तींच्या आत्महत्या अपेक्षाभंगातून होतात. शिक्षण घेऊनही मनासारखी नोकरी मिळाली नाही. मिळालेली नोकरी सुटली. अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही. शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याच्या कारणातून आत्महत्या होतात.नैराश्य : सतत येणारे अपयश, आर्थिक कोंडी, बेकारी, नातेवाइकांकडून असलेल्या अपेक्षा आणि समाज काय म्हणेल, या चिंतेतून नैराश्य वाढते. नैराश्याचे योग्य व्यवस्थापन करता न आल्याने अनेकांच्या आत्महत्या होतात.

लहान वयात आत्महत्या ?आत्महत्या करणाऱ्यांमध्ये २० ते ४० वयोगटातील व्यक्तींची संख्या जास्त आहे. शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांमध्ये व्यवस्थेबद्दल उदासीनता वाढते. परिस्थितीला सामोरे जाण्याऐवजी ते मानसिकदृष्ट्या हार स्वीकारून आत्महत्या करतात.

महिलांची मानसिकता कणखरनोकरी आणि कुटुंब सांभाळणे, लग्नानंतर होणारा अपेक्षाभंग, व्यसनी पती आणि मुलांना सांभाळून घेणे अशा अनेक आघाड्यांवर महिलांना कसरत करावी लागते. तरीही महिला शक्यतो हार मानत नाहीत. परिस्थिती सुधारेल या सकारात्मक मानसिकतेमुळे त्या आत्महत्येचा विचार करीत नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण कमी आहे.

नकारात्मक मानसिकता आणि वाढत्या अपेक्षा यामुळे आत्महत्येचे विचार बळावतात. कुटुंबीयांशी सुसंवाद आणि मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने आत्महत्यांचे प्रमाण कमी होऊ शकते. - कालिदास पाटील - मानसोपचार तज्ज्ञ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी