कोल्हापूर : टीईटी संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करावी, या प्रमुख मागणीसाठी शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ, संस्थाचालक संघाच्या वतीने उद्या, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता दसरा चौकातून मोर्चा काढणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास २ हजार ८८२ शाळांची घंटाच वाजणार नाही.टीईटी संदर्भातील अन्यायकारक निर्णय राष्ट्रीय शिक्षण हक्क कायदा (आरटीई) लागू झाल्यानंतर २३ ऑगस्ट, २०१० रोजी एनसीर्टईने शिक्षक भरतीसाठी किमान पात्रता जाहीर केली. या नियमानुसार २०१० नंतर नियुक्त होणाऱ्या शिक्षकांसाठी डीएड, बीएड प्लस टीईटी अनिवार्य केली आहे. महाराष्ट्र शासनानुसार १३ फेब्रुवारी २०१३ पासून टीईटी लागू केली आहे. याचा अर्थ २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटीची सक्ती लागू नाही. परंतु, १ सप्टेंबर २०२५ सर्वोच्च न्यायालयाने धक्कादायक आदेश देत सर्व शिक्षकांना सक्ती केली. फक्त सेवानिवृत्तीलाही पाच वर्षे उरलेल्या शिक्षकांना सूट दिली असली तरी प्रमोशनसाठीही टीईटी बंधनकारक आहे. आरटीई कलम २३ मध्ये सुधारणा करून २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांना कायमस्वरुपी संरक्षण देण्यात यावे.महाराष्ट्र सरकाने शिक्षकांचा प्रश्न तातडीने हाताळावा आणि केंद्रस्तरीय चर्चेला सुरुवात करावी. १५ मार्च २०२४ चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा. यासह अन्य मागण्यांसाठी उद्या मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जवळपास १२ ते १५ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे सर्व शाळा बंद राहणार आहेत.
- जिल्ह्यातील शाळांची संख्याजिल्हा परिषद प्राथमिक शाळा : १९७०
- जिल्हा परिषद माध्यमिक : ८५६
- कोल्हापूर महापालिका : ५६
- एकूण शाळा : २८८२
Web Summary : Kolhapur teachers protest mandatory TET, demanding reconsideration for pre-2013 educators. Around 2,882 schools will be closed as 12-15,000 teachers participate in the march, seeking government intervention and RTE protection.
Web Summary : कोल्हापुर में टीईटी अनिवार्यता के खिलाफ शिक्षकों का प्रदर्शन, 2013 से पहले के शिक्षकों के लिए पुनर्विचार की मांग। लगभग 2,882 स्कूल बंद रहेंगे क्योंकि 12-15,000 शिक्षक सरकार से हस्तक्षेप और आरटीई सुरक्षा की मांग करते हुए मार्च में भाग लेंगे।