शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
4
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
5
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
6
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
7
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
8
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
9
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
10
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
11
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
12
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
13
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
14
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
15
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
16
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
17
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
19
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
20
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!

प्रदूषणमुक्तीसाठी नाग नदीला १९०० कोटी; कोल्हापूरच्या पंचगंगेला ठेंगा

By भीमगोंड देसाई | Updated: March 5, 2025 12:12 IST

प्रकल्प अंमलबजावणीस मंजुरी : १२ वेळा केंद्रासह राज्याकडे प्रस्ताव, तरीही बेदखल

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत नागपूर येथील नाग नदीप्रदूषण प्रतिबंधासाठी १९२६ कोटींच्या प्रकल्प अंमलबजावणीस राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने सोमवारी मंजुरी दिली. याउलट देशातील दहा नद्यांमध्ये प्रदूषित असलेल्या कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी आतापर्यंत १२ वेळा शासनाकडे प्रस्ताव पाठवून ठेंगा दाखवण्यात आला आहे. केंद्र, राज्य सरकार भरीव निधी देण्यास बेदखल करीत असल्याने पंचगंगा गटारगंगा बनत आहे.तीन दशकांहून अधिक काळ पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी लोकचळवळीचा दबाव वाढल्याने प्रशासन शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवत आहे. ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकीत हा प्रश्न प्रमुख पक्षाचे उमेदवार प्रचारात ऐरणीवर आणतात. पण सत्तेत आल्यानंतर त्यांना निधी मिळवता आला नाही. तर नागपूर महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील नाग नदीतील प्रदूषण प्रतिबंधासाठी पाठवलेल्या १९२६ कोटींच्या आराखडा अंमलबजावणीस नुकतीच मान्यता मिळाली आहे.यामध्ये सर्वाधिक केंद्र सरकारचा १११५ कोटींचा, राज्य सरकारचा ५०७ कोटी, नागपूर महापालिकेचा ३०४ कोटींचा हिस्सा आहे. केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या चाव्या नागपुरात असल्याने विकासातही त्यांना झुकते माप मिळाल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या बाजूला सत्तेचे केेंद्र नसल्याने कोल्हापूर पंचगंगेला निधीसाठी केवळ प्रतीक्षाच करावी लागत आहे.

  • कोल्हापूर, इचलकरंजी, १५ मोठ्या गावांतील सर्वाधिक सांडपाणी पंचगंगेत मिसळते.
  • पाच औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणीही जबाबदार
  • चार साखर कारखान्यांवर फौजदारी खटले, तरीही हंगामात रसायनमिश्रित पाणी नदीतच सोडले जाते.
  • अलीकडे ९७ कोटी निधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पडून
  • पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न उच्च न्यायालयात
  • महायुतीच्या सरकारमध्ये नदीत मूर्ती, निर्माल्य विसर्जित करून प्रदूषण निर्मूलन उपक्रमाचा फज्जा

तिथे आणि येथे..नागपुरात महापालिकेने पुढाकार घेऊन एकत्रित असा आराखडा तयार करून राज्य, केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. येथे पंचगंगेसाठी निधीसाठी महापालिका, जिल्हा परिषद स्वतंत्र आराखडा तयार करते आणि आपापल्या विभागाकडे पाठपुरावा करते. एकत्रित प्रस्ताव पाठवलेला नाही. निधी न मिळण्यात या दोन विभागांचा समन्वय नसणे, लोकप्रतिनिधींचा राजकीय दबदबा नसणे ही दोन प्रमुख कारणे असल्याचे पुढे आले आहे.

केवळ प्रस्तावाचे आकडे बदलेलेसन २०१४ मध्ये १०८ कोटी त्यानंतर ९४ कोटी, २७ कोटी, २५२ कोटी आणि आता ९७ कोटी असे वेगवेगळ्या आकड्यांचे निधीसाठी १२ प्रस्ताव शासनाकडे गेले आहेत. नवीन सरकार आणि अधिकारी आले की प्रस्तावातील केवळ आकडे बदललेले आहेत.

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी एकत्रितपणे प्रस्ताव तयार करून केंद्र, राज्य शासनाकडे निधीसाठी पाठवण्यात आलेला नाही. पाठपुरावाही झालेला नाही. म्हणून भरीव निधीही मिळालेला नाही. - उदय गायकवाड, पर्यावरणतज्ज्ञ, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरnagpurनागपूरriverनदीpollutionप्रदूषण