शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस: राधानगरीच्या अभयारण्यात १८ बिबट्यांचा वावर

By संदीप आडनाईक | Updated: May 3, 2025 12:14 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : सह्याद्रीमधील जैवविविधतेने समृद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात कायम बिबट्याचे वास्तव्य आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत प्रदेशनिष्ठ स्वरूप हे ...

संदीप आडनाईककोल्हापूर : सह्याद्रीमधील जैवविविधतेने समृद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात कायम बिबट्याचे वास्तव्य आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत प्रदेशनिष्ठ स्वरूप हे त्याचे वैशिष्ट्य आहे. कोल्हापूर वन्यजीव विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार ३५१.१६ चौरस किलोमीटरपर्यंत पसरलेल्या राधानगरी अभयारण्य क्षेत्रात सुमारे १८ बिबट्यांची नोंद आहे.बिबटे दाट झाडीच्या प्रदेशात राहतात, शिवाय ते झाडावर जास्त वेळ घालवतात. बिबट्याला बिबळ्या किंवा वाघरू असेही म्हणतात. हा मार्जार कुळातील मोठ्या जातींमध्ये सर्वाधिक आढळणारा प्राणी आहे, परंतु मोठ्या जातींमध्ये आकाराने सर्वांपेक्षा लहान आहे. नर बिबट्याचे वजन ६० ते ७० किलो आणि मादी बिबट्याचे ३३-४० किलो इतके असते. बिबटे मनुष्यवस्तीजवळ राहणे जास्त पसंत करतात. तेथील कुत्री, पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे. यामुळेच दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात.सध्या दाजीपूरच्या अभयारण्यात १८ बिबट्यांचा वावर आहे, असे वन विभागाच्या वन्यजीव खात्याची आकडेवारी आहे. बिबट्याची कातडीसाठी तस्करी केली जाते. त्यासाठी त्याची शिकार केली जाते.बिबट्यांचा वावर वाढला..राज्य सरकारने राधानगरीसह राज्यातील आठ वनपट्ट्यांना संरक्षण दिल्यामुळे सह्याद्रीमधील बिबट्यांचा वावर सुरक्षित आहे. कोल्हापूर जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. दरवर्षीच्या प्राणीगणनेत कॅमेरा ट्रॅपमध्ये बिबट्यांची छायाचित्रे टिपली जातात. यामुळे हे जंगल जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध असल्याचे अधोरेखित होते. जंगल क्षेत्र नष्ट होत आहेत तसेच खाद्य न मिळाल्याने मानवीवस्तीजवळ बिबट्यांचा वावर वाढत आहे. मादी बिबटे हे ऊस शेतालाच जंगल समजून तिथेच प्रसूती करत आहेत, हे फार धोकादायक चित्र आहे.

संस्थानकाळात बिबट्याच्या नोंदी

कोल्हापूर संस्थानामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज, त्यांच्यानंतर राजाराम महाराजांना शिकारीचा छंद जोपासला होता. त्याचे दस्तावेजही उपलब्ध आहेत. कोल्हापुरात बागल चौकात राहणारे दिवंगत स्वालेमहंमद निजाम चित्तेवान यांच्याकडे वन ट्वेन्टी फॉर्मेटमधील १९५२ च्या दशकातील या १६ मूळ निगेटिव्हजचा दुर्मीळ खजाना होता. लीलावती जाधव या कोल्हापूर संस्थानाच्या काळात वेगवेगळ्या शिकार मोहिमांमध्ये सहभागी झालेल्या आणि जवळून पाहिलेल्या शेवटच्या व्यक्ती होत्या. त्यांच्या पुस्तकातूनही याविषयी प्रकाश पडतो.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरleopardबिबट्याforestजंगल