शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
4
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
5
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
6
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
7
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
8
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
9
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
10
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
11
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
12
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
13
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
14
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
15
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
16
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
17
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
18
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
19
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
20
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
Daily Top 2Weekly Top 5

"२७ गावांतील नागरिकांना पाणी देण्याची जबाबदारी राज्य शासनाची, एमआयडीसी, महापालिकेत समनव्याचा अभाव"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 17:08 IST

Ravindra Chavan And 27 Villages Water : मुबलक पाणी असून २७ गावांत मिळत नाही हे गंभीर आहे असे ते म्हणाले. महापालिका आणि एमआयडीसी या दोन्ही यंत्रणांनी आपापसांत चर्चा करा, समन्वय समिती नेमा, निधी नसेल तर जिल्हा नियोजन समितीत असलेल्या निधीचा वापर करा

डोंबिवली - २७ गावांत पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत असून लोकप्रतिनिधी नागरिकांना उत्तर देऊन हैराण झाले आहेत. एमआयडीसी, महापालिका या यंत्रणांनी खोटी आश्वासन देऊन वेळ मारून नेऊ नये. तातडीने त्यावर उपाय योजना काढून समस्या मार्गी लावायला हवी. बारवी धरणात आता पुरेसा पाणीसाठा आहे, त्यामुळे पाणी नाही हे कारण ऐकून घेतले जाणार नाही. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यामध्ये लक्ष घालून समस्या तात्काळ सोडवावी अशी मागणी आमदार रवींद्र चव्हाण यांनी देसाईंकडे केली. सोमवारी चव्हाण यांनी एमआयडीसीच्या डोंबिवली येथील कार्यालयात कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांची भेट घेतली, त्यावेळी २७ गावातील पाणी समस्येवर चर्चा झाली. आणखी दीड वर्ष कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता असून त्यानंतर जलवाहिन्याची नवनिर्मिती तसेच अन्य टॅपिंगची कामे झाली की पाणी वितरण सुरळीत होईल असे अधिकारी कसे काय सांगू शकतात? असा सवाल चव्हाण यांनी उद्योगमंत्री देसाई यांना केला. त्यांनी मोबाइलवरून या समस्ये संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. 

मुबलक पाणी असून २७ गावांत मिळत नाही हे गंभीर आहे असे ते म्हणाले. महापालिका आणि एमआयडीसी या दोन्ही यंत्रणांनी आपापसांत चर्चा करा, समन्वय समिती नेमा, निधी नसेल तर जिल्हा नियोजन समितीत असलेल्या निधीचा वापर करा. जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांना त्याबाबत विचारणा करून त्यांचे मार्गदर्शन घ्या पण समस्या तात्काळ सोडवा असे चव्हाण म्हणाले. एखादी महिला नगरसेवक आत्मदहन इशारा देते यावरून पाणी समस्या किती गंभीर असेल याचा विचार होणे गरजेचे असून पाणी समस्या तात्काळ मार्गी लावा असे ते।म्हणाले. त्यावेळी माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, अमर माळी, जालिंदर पाटील, निलेश म्हात्रे, विशू पेडणेकर, नंदू परब, नंदू जोशी, मनीषा राणे आदींसह कार्यकर्ते त्यावेळी उपस्थित होते.

१०० टँकरने सर्वत्र गावांमध्ये पाणी पुरवठा करण्यात यावा असे चव्हाण म्हणाले. पाणी सगळ्यांना मिळायला हवं याचे नियोजन करा. त्या टँकरचे मूल्य कोणाकडून घेऊ नका. त्यासाठी जिल्हाधिकारी मार्गदर्शन करू शकतील. मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करून समस्या निकाली येऊ शकते तर इथं का नाही? असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीWaterपाणीSubhash Desaiसुभाष देसाई