शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

"२७ गावांतील नागरिकांना पाणी देण्याची जबाबदारी राज्य शासनाची, एमआयडीसी, महापालिकेत समनव्याचा अभाव"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 17:08 IST

Ravindra Chavan And 27 Villages Water : मुबलक पाणी असून २७ गावांत मिळत नाही हे गंभीर आहे असे ते म्हणाले. महापालिका आणि एमआयडीसी या दोन्ही यंत्रणांनी आपापसांत चर्चा करा, समन्वय समिती नेमा, निधी नसेल तर जिल्हा नियोजन समितीत असलेल्या निधीचा वापर करा

डोंबिवली - २७ गावांत पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत असून लोकप्रतिनिधी नागरिकांना उत्तर देऊन हैराण झाले आहेत. एमआयडीसी, महापालिका या यंत्रणांनी खोटी आश्वासन देऊन वेळ मारून नेऊ नये. तातडीने त्यावर उपाय योजना काढून समस्या मार्गी लावायला हवी. बारवी धरणात आता पुरेसा पाणीसाठा आहे, त्यामुळे पाणी नाही हे कारण ऐकून घेतले जाणार नाही. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यामध्ये लक्ष घालून समस्या तात्काळ सोडवावी अशी मागणी आमदार रवींद्र चव्हाण यांनी देसाईंकडे केली. सोमवारी चव्हाण यांनी एमआयडीसीच्या डोंबिवली येथील कार्यालयात कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांची भेट घेतली, त्यावेळी २७ गावातील पाणी समस्येवर चर्चा झाली. आणखी दीड वर्ष कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता असून त्यानंतर जलवाहिन्याची नवनिर्मिती तसेच अन्य टॅपिंगची कामे झाली की पाणी वितरण सुरळीत होईल असे अधिकारी कसे काय सांगू शकतात? असा सवाल चव्हाण यांनी उद्योगमंत्री देसाई यांना केला. त्यांनी मोबाइलवरून या समस्ये संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. 

मुबलक पाणी असून २७ गावांत मिळत नाही हे गंभीर आहे असे ते म्हणाले. महापालिका आणि एमआयडीसी या दोन्ही यंत्रणांनी आपापसांत चर्चा करा, समन्वय समिती नेमा, निधी नसेल तर जिल्हा नियोजन समितीत असलेल्या निधीचा वापर करा. जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांना त्याबाबत विचारणा करून त्यांचे मार्गदर्शन घ्या पण समस्या तात्काळ सोडवा असे चव्हाण म्हणाले. एखादी महिला नगरसेवक आत्मदहन इशारा देते यावरून पाणी समस्या किती गंभीर असेल याचा विचार होणे गरजेचे असून पाणी समस्या तात्काळ मार्गी लावा असे ते।म्हणाले. त्यावेळी माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, अमर माळी, जालिंदर पाटील, निलेश म्हात्रे, विशू पेडणेकर, नंदू परब, नंदू जोशी, मनीषा राणे आदींसह कार्यकर्ते त्यावेळी उपस्थित होते.

१०० टँकरने सर्वत्र गावांमध्ये पाणी पुरवठा करण्यात यावा असे चव्हाण म्हणाले. पाणी सगळ्यांना मिळायला हवं याचे नियोजन करा. त्या टँकरचे मूल्य कोणाकडून घेऊ नका. त्यासाठी जिल्हाधिकारी मार्गदर्शन करू शकतील. मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करून समस्या निकाली येऊ शकते तर इथं का नाही? असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीWaterपाणीSubhash Desaiसुभाष देसाई