शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"२७ गावांतील नागरिकांना पाणी देण्याची जबाबदारी राज्य शासनाची, एमआयडीसी, महापालिकेत समनव्याचा अभाव"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 17:08 IST

Ravindra Chavan And 27 Villages Water : मुबलक पाणी असून २७ गावांत मिळत नाही हे गंभीर आहे असे ते म्हणाले. महापालिका आणि एमआयडीसी या दोन्ही यंत्रणांनी आपापसांत चर्चा करा, समन्वय समिती नेमा, निधी नसेल तर जिल्हा नियोजन समितीत असलेल्या निधीचा वापर करा

डोंबिवली - २७ गावांत पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत असून लोकप्रतिनिधी नागरिकांना उत्तर देऊन हैराण झाले आहेत. एमआयडीसी, महापालिका या यंत्रणांनी खोटी आश्वासन देऊन वेळ मारून नेऊ नये. तातडीने त्यावर उपाय योजना काढून समस्या मार्गी लावायला हवी. बारवी धरणात आता पुरेसा पाणीसाठा आहे, त्यामुळे पाणी नाही हे कारण ऐकून घेतले जाणार नाही. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यामध्ये लक्ष घालून समस्या तात्काळ सोडवावी अशी मागणी आमदार रवींद्र चव्हाण यांनी देसाईंकडे केली. सोमवारी चव्हाण यांनी एमआयडीसीच्या डोंबिवली येथील कार्यालयात कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांची भेट घेतली, त्यावेळी २७ गावातील पाणी समस्येवर चर्चा झाली. आणखी दीड वर्ष कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता असून त्यानंतर जलवाहिन्याची नवनिर्मिती तसेच अन्य टॅपिंगची कामे झाली की पाणी वितरण सुरळीत होईल असे अधिकारी कसे काय सांगू शकतात? असा सवाल चव्हाण यांनी उद्योगमंत्री देसाई यांना केला. त्यांनी मोबाइलवरून या समस्ये संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. 

मुबलक पाणी असून २७ गावांत मिळत नाही हे गंभीर आहे असे ते म्हणाले. महापालिका आणि एमआयडीसी या दोन्ही यंत्रणांनी आपापसांत चर्चा करा, समन्वय समिती नेमा, निधी नसेल तर जिल्हा नियोजन समितीत असलेल्या निधीचा वापर करा. जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांना त्याबाबत विचारणा करून त्यांचे मार्गदर्शन घ्या पण समस्या तात्काळ सोडवा असे चव्हाण म्हणाले. एखादी महिला नगरसेवक आत्मदहन इशारा देते यावरून पाणी समस्या किती गंभीर असेल याचा विचार होणे गरजेचे असून पाणी समस्या तात्काळ मार्गी लावा असे ते।म्हणाले. त्यावेळी माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, अमर माळी, जालिंदर पाटील, निलेश म्हात्रे, विशू पेडणेकर, नंदू परब, नंदू जोशी, मनीषा राणे आदींसह कार्यकर्ते त्यावेळी उपस्थित होते.

१०० टँकरने सर्वत्र गावांमध्ये पाणी पुरवठा करण्यात यावा असे चव्हाण म्हणाले. पाणी सगळ्यांना मिळायला हवं याचे नियोजन करा. त्या टँकरचे मूल्य कोणाकडून घेऊ नका. त्यासाठी जिल्हाधिकारी मार्गदर्शन करू शकतील. मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करून समस्या निकाली येऊ शकते तर इथं का नाही? असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीWaterपाणीSubhash Desaiसुभाष देसाई