येणाऱ्या काळात केंद्र आणि राज्यातील सरकार सुरळीतपणे चालले पाहिजे ही भावना महाराष्ट्रातील जनतेची आहे. हीच भावना भाजपाचीही आहे. पण काही दिवसांआधी असे घटनाक्रम होत राहिले. त्यातून काही ना काही विषय पुढे जात राहिले असं चव्हाण यांनी सांगितले. ...
एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलून युती केली आहे. हा वरिष्ठांचा विषय आहे. त्यावर बोलण्याची क्षमता रवींद्र चव्हाणांची आहे का त्याचे उत्तर द्यावे असा टोला राजेश कदम यांनी लगावला. ...