जोपर्यंत रस्ता नाही तोपर्यंत मनपाचा टॅक्स भरू नका; मनसे आमदारांचा रहिवाशांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 15:03 IST2020-12-04T15:02:37+5:302020-12-04T15:03:12+5:30
MNS Mla Raju Patil: शुक्रवारी नांदीवली येथील स्वामी समर्थ नगरात पाटील यांनी पाहणी केली

जोपर्यंत रस्ता नाही तोपर्यंत मनपाचा टॅक्स भरू नका; मनसे आमदारांचा रहिवाशांना सल्ला
डोंबिवली: येथील नांदीवली परिसरात स्वामी समर्थ नगरमध्ये समस्यांचे माहेरघर असून नागरिक त्रस्त आहेत. वर्षानुवर्ष या ठिकाणी युतीची सत्ता होती, म्हणायला ही गाव मनपात आहेत, प्रत्यक्षात मात्र तसे दिसत नाही. या भागाला मूलभूत सुविधा नाहीत त्यामुळे या ठिकाणच्या रहिवाश्यानी मनपाला कर भरू नका, मनसे तुमच्या सोबत आहे असे वक्तव्य आमदार राजू पाटील यांनी केले.
शुक्रवारी नांदीवली येथील स्वामी समर्थ नगरात पाटील यांनी पाहणी केली, नागरी समस्यांमुळे तेथे नागरिकाना रस्ते, पाणी,।कचरा या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते हे योग्य नाही असे ते म्हणाले. अनधिकृत बांधकाम होत असतील तर त्याकडे मनपाने लक्षद्यायला हवे असेही ते म्हणाले.