शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 21:17 IST

चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यानंतर भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे की यंदाचा महापौर हा भाजपाचाच असला पाहिजे. हरिश्चंद्र  पाटील यांच्या रूपाने याअगोदर भाजपाला महापौर पद लाभले होते. मात्र सेनेच पारडं पालिकेत जड राहिले आहे.

मयुरी चव्हाण काकडे -

कल्याण डोंबिवली शहराच्या रंगतदार राजकारणामध्ये येणाऱ्या दिवसात अजून नवनवीन ट्विस्ट येणार आहेत. डोंबिवलीचेभाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेली आहे... कल्याण डोंबिवलीत कायमच शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असते. महापालिकेमध्ये एकत्रित हे दोन्ही पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून नांदत असले तरी एकमेकांवर वरचढ होण्याचे दोन्ही पक्षांचे मनसुबे काही लपून राहिलेले नाही. त्यातच आता आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदावरून शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यानंतर भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे की यंदाचा महापौर हा भाजपाचाच असला पाहिजे. हरिश्चंद्र  पाटील यांच्या रूपाने याअगोदर भाजपाला महापौर पद लाभले होते. मात्र सेनेच पारडं पालिकेत जड राहिले आहे. महापौर पदासाठी शिवसेना कायम आग्रही राहिली आहे. आता कल्याण डोंबिवलीच नाही तर एकंदरीतच  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत  चव्हाण यांच्यावर अधिक जबाबदारी  असणार आहे.

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर  विशेषतः कल्याण डोंबिवली शहरात शिंदेंची  शिवसेना आणि भाजप यांच्या पहिली वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर दोन्ही पक्ष कितीही एकत्र आहोत हे दाखवत असले तरी त्यांच्यात पडद्याआडूनही धुसफूस सुरू असल्याच्या अनेक  चर्चा आहेत. डोंबिवली हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. आमदार रवींद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवासही मोठा आहे. स्थानिक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आता तर प्रदेशाध्यक्ष पदावर चव्हाण यांची वर्णी लागल्यामुळे त्यांच्याकडून स्थानिक भाजपच्याही अपेक्षा वाढण्याची शक्यता आहे. इथून मागे झालेल्या निवडणुकीत  शिवसेना ही एक होती.आता पहिल्यांदाच दोन्ही सेना मैदानात उतरणार आहेत. सेनेच्या फुटीचा फायदा भाजपा कशापद्धतीने घेते ते देखील पाहावं लागणार आहे. कारण ज्यांचे जास्त नगरसेवक त्यांचा महापौर असा फॉर्म्युला ठरला तर  जोरदार घमासान होणार!समजा पालिका निवडणुकीत युती झाली किंवा नाही झाली तर मित्रपक्षाच्या अधिक जागा निवडून येता कामा नये  ही राजकीय महत्वकांक्षाही बाळगली जाणार आहे .शिवसेनेचा कल्याण पश्चिमेत दबदबा आहे ..त्या जोरावरच सेनेचा  महापौर पालिकेत विराजमान  झाल्याची पार्श्वभूमी आहे ..मात्र फुटीनंतर तिथेही मतांचं विभाजन होऊ शकते. गत निवडणुकीत शिवसेनेचे ५३ तर भाजपाचे ४३ नगरसेवक  निवडून आले होते ...आता सेनेच्या नगरसेवकांचीही विभागणी झाली आहे.. राज्य पातळीवर कितीही युतीच्या मैत्रीचागाजावाजा केला जात असला तरी स्थानिक पातळीवर राजकीय फटाके फुटणार हे नक्की ...एकीकडे शिंदेशाही तर दुसरीकडे चव्हाणांचा कोकणी बाणा या निवडणुकीत विशेषतः  ठाणे जिल्ह्यात अनुभवायला मिळणार आहे...

मनसेचे राजू पाटील कोणाला देणार टाळी? शिंदेंची सेना आणि भाजप एकत्र नांदत असले तरी मनसेचे नेते राजू पाटील यांचीही भूमिका स्थानिक राजकारणात महत्वाची ठरणार आहे .. गत निवडणुकीत मनसेचे ९ नगरसेवक निवडून आले होते.पालिका निवडणुकीत युती होते की की नाही याबाबत अजूनही शंका व्यक्त होतं आहे ..भाजपाचे नवीन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे राजू पाटील यांचे शेजारी आहे ..दोघांमध्ये मैत्री पण चांगली आहे. त्यामुळे एकीकडे ठाकरे गटाशी जरी मनसेच सूत  जुळत असलं तरी पालिका  निवडणुकीत राजू पाटील शेजारधर्म पाळतात का हा देखील मोठा ट्विस्ट आहे.

टॅग्स :BJPभाजपाRavindra Chavanरविंद्र चव्हाणdombivaliडोंबिवली