शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

आयुक्तांचे पत्र म्हणजे ठराव नाही; १८ गावे वगळण्याबाबत निकाल ठेवला राखून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 12:20 AM

उच्च न्यायालयाचे मत : १८ गावे महापालिकेतून वगळण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका याचिकाकर्ते संदीप पाटील, भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर, संतोष डावखरे यांच्यासह नगरसेविका सुनीता खंडागळे यांनी दाखल केली होती

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतून १८ गावे वगळण्याच्या सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर न्यायालयाने १८ गावे वगळली जावी की नाही, याविषयीचा निकाल राखून ठेवला आहे. गावे वगळण्याबाबत पालिका आयुक्तांनी दिलेले पत्र म्हणजे महासभेचा ठराव होऊ शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने सुनावणीदरम्यान नोंदवले आहे.

१९८३ सालापासून महापालिकेत असलेली २७ गावे सोयीसुविधा मिळत नसल्याने राज्य सरकारने २००२ साली महापालिकेतून वगळली. त्यानंतर ही गावे पुन्हा २०१५ साली महापालिकेत समाविष्ट केली. ही गावे महापालिकेतून वगळण्याची मागणी होती. या गावांची स्वतंत्र नगर परिषद करावी, अशी मागणी केली असताना राज्य सरकारने २७ पैकी १८ गावे वगळून स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र, २७ पैकी नऊ गावे महापालिकेतच ठेवली. 

१८ गावे महापालिकेतून वगळण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका याचिकाकर्ते संदीप पाटील, भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर, संतोष डावखरे यांच्यासह नगरसेविका सुनीता खंडागळे यांनी दाखल केली होती. शुक्रवारी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान १८ गावे महापालिकेतून वगळण्याचा अभिप्राय महापालिकेचा होता का, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला होता. हा प्रश्न यापूर्वीच्या सुनावणीदरम्यानही उपस्थित केला होता. १८ गावे वगळण्याचा ठराव महासभेने केलेला नव्हता. महापालिकेचा अभिप्राय नसताना गावे कशाच्या आधारे वगळली, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावेळी महापालिकेच्या वतीने आयुक्तांनी दिलेले पत्र न्यायालयासमोर सादर करण्यात आले.

लवकरच देणार निकालआयुक्तांनी राज्य सरकारला दिलेल्या पत्रात २७ पैकी नऊ गावे महापालिकेत ठेवावीत, असे म्हटले होते. आयुक्तांंचे पत्र हे महासभेचा अभिप्राय होऊ शकत नाही, असा मुद्दा सुनावणीदरम्यान न्यायालयाने उपस्थित केला आहे. या मुद्यांना महापालिकेचे वकील राव आणि याचिकाकर्त्यांचे वकील दधीची म्हैसपूरकर यांनी दुजोरा दिला आहे. म्हैसपूरकर यांनी सांगितले की, महापालिकेतून गावे वगळता येत नाही. ती वगळण्यापूर्वी महापालिका अधिनियमानुसार अधिसूचना काढावी लागेल. न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला असून, तो लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाHigh Courtउच्च न्यायालय