शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

रस्ते दुरुस्ती आणि नाले सफाईच्या मागणीसाठी साचलेल्या पाण्यात बसून नागरिकांचं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 12:41 IST

Adavali village agitation: आठवड्याभरात रस्त्यांची-नाल्याची दुरुस्ती करा, अन्यथा 27 गावातील प्रत्येक रस्ता बंद करण्याचा इशारा

ठळक मुद्देसंतापलेल्या नागरिकांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून ठिय्या आंदोलन केलं.

कल्याण: राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. यातच, तीन दिवसापासून कल्याण डोंबिवलीत पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर नागरिक त्रस्त झाले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत अनेकदा तक्रार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज संतापलेल्या नागरिकांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून ठिय्या आंदोलन केलं.

आज दुपारी दोन तास कोसळलेल्या पावसाने कल्याण-मलंग रोड वरील आडवली गावातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं होतं. तर काही चाळीमध्ये देखील पाणी शिरलं. पावसाने आधीच जनजीवन विस्कळीत झालंय, त्यात रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. आठवड्याभरात रस्त्याची दुरुस्ती करा, अन्यथा 27 गावातील प्रत्येक रस्ता बंद करू, असा इशारा देत कल्याण ग्रामीणमधील आडवली गावात नागरिकांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन केलं. 

यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत पालिकेचा निषेध नोंदवण्यात आला. तसेच, आडवली गावात नालाच नसल्याने अशी परिस्थिती उदभवत आहे. येत्या आठवडाभरात जर 27 गावांमधली रस्त्यासह नाल्याची काम सुरू केले नाही तर सर्व रस्ते बंद करून रास्तारोको करण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांकडून देण्यात आला. 

टॅग्स :Rainपाऊसkalyanकल्याणagitationआंदोलन