शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

रस्ते दुरुस्ती आणि नाले सफाईच्या मागणीसाठी साचलेल्या पाण्यात बसून नागरिकांचं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 12:41 IST

Adavali village agitation: आठवड्याभरात रस्त्यांची-नाल्याची दुरुस्ती करा, अन्यथा 27 गावातील प्रत्येक रस्ता बंद करण्याचा इशारा

ठळक मुद्देसंतापलेल्या नागरिकांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून ठिय्या आंदोलन केलं.

कल्याण: राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. यातच, तीन दिवसापासून कल्याण डोंबिवलीत पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर नागरिक त्रस्त झाले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत अनेकदा तक्रार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज संतापलेल्या नागरिकांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून ठिय्या आंदोलन केलं.

आज दुपारी दोन तास कोसळलेल्या पावसाने कल्याण-मलंग रोड वरील आडवली गावातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं होतं. तर काही चाळीमध्ये देखील पाणी शिरलं. पावसाने आधीच जनजीवन विस्कळीत झालंय, त्यात रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. आठवड्याभरात रस्त्याची दुरुस्ती करा, अन्यथा 27 गावातील प्रत्येक रस्ता बंद करू, असा इशारा देत कल्याण ग्रामीणमधील आडवली गावात नागरिकांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन केलं. 

यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत पालिकेचा निषेध नोंदवण्यात आला. तसेच, आडवली गावात नालाच नसल्याने अशी परिस्थिती उदभवत आहे. येत्या आठवडाभरात जर 27 गावांमधली रस्त्यासह नाल्याची काम सुरू केले नाही तर सर्व रस्ते बंद करून रास्तारोको करण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांकडून देण्यात आला. 

टॅग्स :Rainपाऊसkalyanकल्याणagitationआंदोलन