आत्तापर्यंत समाजात कार्यरत असलेले अनेक लोक आपल्याला माहित असतील ज्यांनी समाजातील गरीब मुलांना मदतीचा हात दिला आहे. ज्यांच्या मदतीमुळे अनेक लोकांचे आयुष्य सफल झाले आहे. आज आम्ही तुम्हला अशाच एका महिलेबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी गोरगरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी मोहिम हाती घेतली आहे.
ऋचा यांचे असे म्हणणे आहे की ,जगण्यासाठी गरजेच्या असलेल्या वस्तुंपासून वंचीत असलेल्या मुलांबद्दल त्यांचा मनात सॉफ्ट कॉर्नर आहे. अशा गरजवंत मुलांना मदत करून त्यांना या मुलांचे आयुष्य बदलून टाकायचे आहे. म्हणून त्या गरीब मुलांना शिक्षण मिळण्यासाठी झटत आहेत. जेणेकरून त्यांना इतर मुलांपेक्षा वेगळं असल्यासारखं वाटणार नाही. ऋचा यांना मदत करण्यासाठी अनेक स्वयंसेवक आहेत. या गरीब मुलांना शिक्षण देण्यात सुमारे १०० लोकांची मदत आहे. यात ८ वर्षांपासून ८० वर्षापर्यंतच्या स्वयंसेवकांचा समावेश आहे. या सत्कार्यात ऋचा यांना त्यांच्या कुटूंबाचा तसेच मित्रपरिवाराचा आणि काही सामाजीक संघटनांचा सहभाग लाभला आहे.
ऋचा यांनी या संस्थेची स्थापना २००९ मध्ये केली. त्यावेळी फक्त ६ मुलांना सोबत घेऊन त्यांनी सरूवात केली. सध्याच्या परिस्थितीत त्याच्या देखरेखीखाली शिक्षण घेत असलेल्यांची संख्या ५०० च्या पुढे आहे. ऋचा या फाऊंडेशनच्या माध्यमातून अधिकाधिक मुलांचे भवितव्य सुखकर करण्याच्या प्रयत्नात आहेत.
ऋचा या मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान देत नाहीत. तर वेगवेगळे सेमिनार आणि वर्कशॉपचे आयोजन करून मुलांचा विकास करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या या उपक्रमाबद्दल सांगताना ऋचा सांगतात की नेहमीच फायदा होईल असं काम करण्यापेक्षा मी आत्मिक समाधान होईल असं आणि लहान मुलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी काम करत आहे.