शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
4
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
5
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
7
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
8
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
9
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
10
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
11
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
12
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
13
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
14
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
15
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
16
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
17
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
18
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
19
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
20
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर

कोर्टरूम ड्रामा; आजी-आजोबांच्या 'युती'साठी मागवली शेव अन् दिली साईबाबाची शपथ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 14:56 IST

संसार म्हटला की, भांडणं आलीच...पण नवरा-बायकोची भांडणं कशावरून होतील हे काही कुणाला सांगता येणार नाही.

संसार म्हटला की, भांडणं आलीच...पण नवरा-बायकोची भांडणं कशावरून होतील हे काही कुणाला सांगता येणार नाही. मोबाइलवरून झालेलं भाडण तुम्ही ऐकलं असेल, नातेवाईकांमुळे झालेलं भांडण तुम्ही ऐकलं असेल पण तुम्ही कधी एखाद्या भाजीवरून भांडण झाल्याचं पाहिलं का? नसेल ऐकलं तर अशीच एक घटना समोर आली आहे. एका भाजीमुळे भांडण झाल्याने नवरा-बायको तब्बल १७ वर्ष एकमेकांपासून दूर राहिले. आता १७ वर्षांनंतर कोर्टाने हे प्रकरण मिटवलं आहे.

ही घटना आहे मध्य प्रदेशातील देवासची. येथील आजी-आजोबांच्या वयाच्या एका जोडप्याचं भाजीवरून भांडण झालं होतं. पतीने शेवभाजी करण्याची इच्छा व्यक्ती केली होती. पण पत्नीने काही शेवभाजी केली नाही. झालं याकारणाने दोघे १७ वर्ष एकमेकांपासून वेगळे राहिले. आता कोर्टाने हा वाद मिटवला. पत्नीने पतीला १७ वर्षांनी शेवभाजी करून खाऊ घातली आणि हा वाद मिटला.

दैनिक भास्करने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, सध्या या पतीचं वय ७९ तर पत्नीचं वय ७२ आहे. पतीने रिटायरमेंटनंतर मिळालेला पैसा पत्नीच्या नावावर केला होता. देवासमधील त्यांचं घरही पत्नीच्या नावावर आहे. तसेच पेन्शनची रक्कमही पत्नीच्या अकाऊंटमध्ये जाते. पण रिटायरमेंटच्या दोन दिवसातच दोघांमध्ये भाजीवरून भांडण झालं होतं.

असे सांगितले जात आहे की, पतीने पत्नीकडे शेवभाजी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पत्नी यासाठी पतीला शेव आणून द्या असं सांगितलं. यावर पतीने पत्नीकडे पैसे मागितल्यावर पत्नीने त्यांना नको नको ते ऐकवलं. पैशांवरून दोघांमध्ये मोठं भांडण झालं. शेवटी झालं असं की, पत्नीने भाजी बनवली नाही. तेच संतापलेल्या पतीने सकाळी काही न सांगताच घर सोडलं.

रिपोर्टनुसार, पती बुलडाण्यातील मोताडा या गावात राहू लागले. इतकेच नाही तर पेन्शनची रक्कमही स्वत:च्या अकाऊंटमध्ये येईल अशी व्यवस्था करून घेतली. म्हणजे पत्नीच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होणे बंद झाले. मग काय हे प्रकरण थेट कोर्टात गेलं. २०१६ मध्ये जिल्हा न्यायालयात केसची सुनावणी सुरू झाली. पत्नीला हेही माहीत नव्हतं की, पती कुठे आहेत.

चौकशी केल्यावर समोर आले की, पती बुलडाण्यातील एका गावात आहेत. पोलिसांनी पतीला कोर्टात आणून उभं केलं. पतीने घडलेला सगळा प्रकार कोर्टासमोर सांगितला. हे प्रकरण ऐकून न्यायाधिशही हैराण झाले. त्यानंतर त्यांनी दोघांशी बातचीत केली.

अखेर कोर्टाने दोघांमधील वाद मिटवण्यासाठी ५० रूपयांचं शेवाचं पॅकेट मागवून घेतलं. पत्नीला सांगण्यात आले की, पतीसाठी शेवभाजी करा. दोघे कोर्टातून सोबत घरी गेले. पत्नी पतीसाठी शेवभाजी केली. नंतर पुन्हा कोर्टात गेले. दोघांनीसोबत राहण्याची तयारी दर्शवली. पण पतीने पुन्हा पत्नी भांडण करणार नाही, याची श्वाश्वती मागितली. यावर पतीच म्हणालीकी, पत्नीने साईबाबांची शपथ घ्यावी की, असं पुन्हा करणार नाही. कोर्टाने दोघांना शिरडीला पाठवले. पत्नी शपथ घेतली. आश्चर्याची बाब म्हणजे दोघेही एकत्र आल्याने आनंदी आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेMadhya Pradeshमध्य प्रदेशCourtन्यायालय