शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
3
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
4
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
5
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
6
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
7
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
8
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
9
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
10
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
11
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
12
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
13
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
14
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
15
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
16
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
17
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
18
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
19
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
20
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”

कोर्टरूम ड्रामा; आजी-आजोबांच्या 'युती'साठी मागवली शेव अन् दिली साईबाबाची शपथ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 14:56 IST

संसार म्हटला की, भांडणं आलीच...पण नवरा-बायकोची भांडणं कशावरून होतील हे काही कुणाला सांगता येणार नाही.

संसार म्हटला की, भांडणं आलीच...पण नवरा-बायकोची भांडणं कशावरून होतील हे काही कुणाला सांगता येणार नाही. मोबाइलवरून झालेलं भाडण तुम्ही ऐकलं असेल, नातेवाईकांमुळे झालेलं भांडण तुम्ही ऐकलं असेल पण तुम्ही कधी एखाद्या भाजीवरून भांडण झाल्याचं पाहिलं का? नसेल ऐकलं तर अशीच एक घटना समोर आली आहे. एका भाजीमुळे भांडण झाल्याने नवरा-बायको तब्बल १७ वर्ष एकमेकांपासून दूर राहिले. आता १७ वर्षांनंतर कोर्टाने हे प्रकरण मिटवलं आहे.

ही घटना आहे मध्य प्रदेशातील देवासची. येथील आजी-आजोबांच्या वयाच्या एका जोडप्याचं भाजीवरून भांडण झालं होतं. पतीने शेवभाजी करण्याची इच्छा व्यक्ती केली होती. पण पत्नीने काही शेवभाजी केली नाही. झालं याकारणाने दोघे १७ वर्ष एकमेकांपासून वेगळे राहिले. आता कोर्टाने हा वाद मिटवला. पत्नीने पतीला १७ वर्षांनी शेवभाजी करून खाऊ घातली आणि हा वाद मिटला.

दैनिक भास्करने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, सध्या या पतीचं वय ७९ तर पत्नीचं वय ७२ आहे. पतीने रिटायरमेंटनंतर मिळालेला पैसा पत्नीच्या नावावर केला होता. देवासमधील त्यांचं घरही पत्नीच्या नावावर आहे. तसेच पेन्शनची रक्कमही पत्नीच्या अकाऊंटमध्ये जाते. पण रिटायरमेंटच्या दोन दिवसातच दोघांमध्ये भाजीवरून भांडण झालं होतं.

असे सांगितले जात आहे की, पतीने पत्नीकडे शेवभाजी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पत्नी यासाठी पतीला शेव आणून द्या असं सांगितलं. यावर पतीने पत्नीकडे पैसे मागितल्यावर पत्नीने त्यांना नको नको ते ऐकवलं. पैशांवरून दोघांमध्ये मोठं भांडण झालं. शेवटी झालं असं की, पत्नीने भाजी बनवली नाही. तेच संतापलेल्या पतीने सकाळी काही न सांगताच घर सोडलं.

रिपोर्टनुसार, पती बुलडाण्यातील मोताडा या गावात राहू लागले. इतकेच नाही तर पेन्शनची रक्कमही स्वत:च्या अकाऊंटमध्ये येईल अशी व्यवस्था करून घेतली. म्हणजे पत्नीच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होणे बंद झाले. मग काय हे प्रकरण थेट कोर्टात गेलं. २०१६ मध्ये जिल्हा न्यायालयात केसची सुनावणी सुरू झाली. पत्नीला हेही माहीत नव्हतं की, पती कुठे आहेत.

चौकशी केल्यावर समोर आले की, पती बुलडाण्यातील एका गावात आहेत. पोलिसांनी पतीला कोर्टात आणून उभं केलं. पतीने घडलेला सगळा प्रकार कोर्टासमोर सांगितला. हे प्रकरण ऐकून न्यायाधिशही हैराण झाले. त्यानंतर त्यांनी दोघांशी बातचीत केली.

अखेर कोर्टाने दोघांमधील वाद मिटवण्यासाठी ५० रूपयांचं शेवाचं पॅकेट मागवून घेतलं. पत्नीला सांगण्यात आले की, पतीसाठी शेवभाजी करा. दोघे कोर्टातून सोबत घरी गेले. पत्नी पतीसाठी शेवभाजी केली. नंतर पुन्हा कोर्टात गेले. दोघांनीसोबत राहण्याची तयारी दर्शवली. पण पतीने पुन्हा पत्नी भांडण करणार नाही, याची श्वाश्वती मागितली. यावर पतीच म्हणालीकी, पत्नीने साईबाबांची शपथ घ्यावी की, असं पुन्हा करणार नाही. कोर्टाने दोघांना शिरडीला पाठवले. पत्नी शपथ घेतली. आश्चर्याची बाब म्हणजे दोघेही एकत्र आल्याने आनंदी आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेMadhya Pradeshमध्य प्रदेशCourtन्यायालय