शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

प्रत्येक गाडीच्या टायरचा रंग काळाच का असतो? कधी विचारही नसेल केला या कारणाचा....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 3:23 PM

तुम्ही कधी विचार केलाय का की, गाड्यांच्या टायरचा रंग काळाच का असतो? जर तुम्ही कधी याचा विचारच केला नसेल तर आज आम्ही याबाबत आश्चर्यकारक माहिती सांगणार आहोत.

बालपणी सायकलपासून सुरूवात होते आणि मोठे झालो की, आपण वेगवेगळ्या गाड्या चालवतो. कधी बाइक, स्कूटी, कार, जीप, ट्रक...गाडी कोणतीही असो काही गोष्टी सेमच असतात. त्यातील एक बाब म्हणजे सर्व गाड्यांचा टायर एकसारखा असतो. भलेही त्यांची साइज वेगळी असेल, पण सर्वांचा रंग एकच असतो. प्रत्येक गाडीच्या टायरचा रंग काळा (Tyre Colour Black Why) असतो. 

पण तुम्ही कधी विचार केलाय का की, गाड्यांच्या टायरचा रंग काळाच का असतो? जर तुम्ही कधी याचा विचारच केला नसेल तर आज आम्ही याबाबत आश्चर्यकारक माहिती सांगणार आहोत. Interesting Facts About Tyre).

या रंगीबेरंगी दुनियेत सर्वच टायरचा रंग काळा असतो.  यामागचं कारणही खास आहे. याकडे टायरच्या मजबूतीला जोडून बघितलं जातं. टायर हे रबरपासून तयार केले जातात. रबराचा रंग पांढरा असतो आणि रबरापासून टायर फार लवकर घासले जात होते. त्यामुळे टायरच्या मजबूतीवर प्रश्न उपस्थित होत होते. 

नंतर रिसर्चमधून समोर आलं की, रबरामध्ये कार्बन आणि सल्फर मिश्रित केले तर टायर मजबूत तयार  केला जाऊ शकतो असं केल्यावर टायरचा रंग पांढऱ्याचा काळा झाला. 

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, साध्या रबराचा टायर साधारण ८ हजार किलोमीटरपर्यंत चालू शकतो. तेच कार्बनयुक्त रबराचा टायर १ लाख किलोमीटरपर्यंत चालू शकतो. कार्बनसोबत यात सल्फरही मिश्रित केलं जातं. यावरून हे स्पष्ट होतं की, टायर बनवण्यासाठी रबरात कार्बन टायर मजबूत होण्यासाठी टाकलं जातं.

लहान मुलांच्या सायकलचे टायर रंगीबेरंगी आणि सुंदर असतात. त्यांच्या टायरसाठी वापरण्यात आलेल्या रबरामध्ये कार्बन नसतं. लहान मुलांचं वजन कमी असतं आणि अशात टायर जास्त मजबूत बनवण्याची चिंता नसते. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके