शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
2
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
3
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
4
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
5
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
6
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
7
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
8
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
9
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
10
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
11
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 
12
बेपत्ता झालेल्या राजा आणि सोनमची करण्यात आली होती रेकी, दुचाकीचे लोकेशन आले समोर
13
Nirjala Ekadashi 2025:निर्जला एकादशीचा उपवास, करा साबुदाण्याची खमंग- कुरकुरीत भजी!
14
३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले
15
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."
16
Chenab Railway Bridge: आयफेल टॉवरपेक्षाही उंच! मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन
17
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
18
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन्स दिले...
19
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
20
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...

प्रेरणादायी! वडिलांच्या अश्रूंनी ओसाड प्रदेशात फुलली हिरवळ, कन्याजन्मानंतर लागतात १११ झाडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:06 IST

महाराष्ट्रातून प्रेरणा, राजस्थानमधील दुष्काळाला हरवले, बहिणींची पहिली राखी झाडांना; गोष्ट तीव्र दुष्काळाचा डाग पुसणाऱ्या पिपलांत्री गावाची

महेश घोराळे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील चार हजार लोकसंख्येचे पिपलांत्री गाव, कधी काळचा दुष्काळ आणि प्रदूषणामुळे येथील लोक गाव सोडून जात असत. पण, २० वर्षांपूर्वी एक व्यक्ती परिवर्तनाच्या दृढनिश्चयाने सरपंच होऊन पुढे येतो. मुलीच्या स्मरणार्थ एक झाड लावून ही हिरवी वाट धरतो. याच वाटेवर आज प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर गावात १११ देशी वृक्षांची लागवड होते. महाराष्ट्रातील पाणीदार गावांकडून प्रेरणा घेऊन या गावाने ४ लाखांहून अधिक झाडे जगवली व ओसाड जमिनीवर हिरवे स्वप्न फुलविले. 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिपलांत्रीचे माजी सरपंच, तथा समाजसेवक पद्मश्री डॉ. श्याम सुंदर पालिवाल यांनी लोकमतला सांगितले की, परिसरातील खाणींमुळे पर्यावरणाच्या विविध समस्यांनी घेरलेल्या गावात मी सरपंच म्हणून निवडून आलो. २००५ पासून ओसाड गावचा हिरव्या वाटेवरचा प्रवास सुरू झाला. खाणींवर नियंत्रण, जलसंधारण मोहीम, वृक्षलागवड आदी कामे हाती घेऊन श्रमदानातून ती पूर्ण केली.

लेकीच्या स्मरणात पहिलं रोप

२००७ मध्ये पालीवाल यांच्या मुलीचा डिहायड्रेशनमुळे मृत्यू झाला. त्यांनी कुरणात मुलीच्या स्मृतीप्रित्यर्थ एक रोप लावले. या भावनिक प्रसंगात अश्रू दाटलेले गाव एकत्र झाले. या एका रोपासाठी गावाच्या भावना जागृत होऊ शकतात, तर या विधायक कामासाठी गावकऱ्यांना एकत्र आणता येईल, या विचारातून त्यांनी मोहीम हाती घेतली.

महाराष्ट्रातून प्रेरणा

डॉ. पालिवाल यांनी सरपंच झाल्यानंतर महाराष्ट्रातील राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजार या अहिल्यानगर जिल्ह्यातील आदर्श गावांना भेटी देऊन येथून गावाच्या विकासाची प्रेरणा घेतली. या गावांतील स्वावलंबन, पर्यावरण संवर्धन आणि सामूहिक विकासाची बिजे त्यांनी आपल्या पिपलांत्री गावामध्ये रोवली. भोवतालच्या परिसरात गावकऱ्यांनी श्रमदानातून कडुलिंब, शिसम, आंबा, वड, पिंपळासारखी विविध प्रजातींची लाखो झाडे जगविली. त्यामुळे शुष्क क्षेत्रात वसलेले हे गाव आज  हिरवेगार झाल्याने  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवत आहे.

२० वर्षांपूर्वी खाणींमुळे मलब्याचे पहाड, प्रदूषणामुळे श्वसनाचा त्रास व्हायचा. टँकर, रेल्वेने गावात यायचे पाणी. खोलं भूजल, कोरडी शिवारं अन् हवालदिल शेतकरी अशी स्थिती होती. जैवविविधतेचा ऱ्हास, बेरोजगारी, स्थलांतर व्हायचे. आता स्वच्छतेत गाव आदर्श. जलसंधारणामुळे भूजल वाढले. स्त्री सन्मान, सेंद्रिय शेती, वृक्षारोपणामुळे समृद्धी. गावावर शेकडो लघुपट, सिनेमे येथे तयार होतात. देशविदेशातून भेटीसाठी लोक येतात.

दरवर्षी झाडांचा उत्सव

गावात १११ झाडे लावण्याची प्रथा निरंतर सुरूच असून, प्रत्येक रक्षाबंधनाला येथे पर्यावरणाचा अनोखा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येतो. गावातील मुली आपल्या भावंडांप्रमाणे वाढविलेल्या झाडांना राखी बांधून त्यांच्या रक्षणाची प्रतिज्ञा करतात. पालकही लावलेल्या झाडांची देखभाल करण्याचे आणि मुलींना शिक्षण देण्याचे वचन देतात.

गावात जलसंरक्षण, वृक्षारोपण, शिक्षण, आत्मनिर्भरता, स्वच्छता, आदी विविध क्षेत्रांत आम्ही काम केले. लाखोंच्या संख्येने परिसरात झाडे वाढविली आहेत. येथून प्रेरणा येऊन विविध देशांतील लोक आपापल्या गावात काम करीत आहेत.-डॉ. श्याम सुंदर पालिवाल, माजी सरपंच, पिपलांत्री

टॅग्स :Rajasthanराजस्थान