शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

कचऱ्यातल्या ग्लुकोज बॉटल्सही ठरल्या 'गुणकारी', लाखो रुपये कमावू लागला 'रँचो' शेतकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 12:53 PM

अनेक शेतकऱ्यांना आवश्यक वस्तूंच्या कमतरतेमुळे नुकसान सहन करावं लागतं. याच कारणाने अनेक शेतकरी आत्महत्या करतात.

भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. आजही देशातील ७५ लोक हे शेती करतात. हे देशातील जास्तीत जास्त लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. पण अनेक भागात कमी पाऊस होणे आणि जुन्याच पद्धती वापरल्याने शेतकऱ्यांना फायदा होत नाही. अनेक शेतकऱ्यांना आवश्यक वस्तूंच्या कमतरतेमुळे नुकसान सहन करावं लागतं. याच कारणाने अनेक शेतकरी आत्महत्या करतात.

हीच स्थिती मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल जिल्हा झाबुआमध्ये झाली होती. डोंगराळ आदिवासी क्षेत्रात शेती करणं कठिण होतं. येथील माती आणि पावसाची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना पिक कमी व्हायचं. अशात रमेश बारिया नावाच्या एका शेतकऱ्याने वेगवेगळ्या समस्यांवर मात करत चांगली शेती करण्याची इच्छा ठेवली. 

त्यातून त्यांनी २००९-१० मध्ये NAIP (राष्ट्रीय कृषि नवाचार परियोजना) KVK वैज्ञानिकांसोबत संपर्क साधला आणि त्यांच्या मार्गदर्शनात हिवाळा आणि पावसाळ्यात छोटयाशा जागेत भाज्यांची शेती सुरू केली. ही जमिनही अशा पिकासाठी फायदेशीर होती. इथे त्यांनी कारले, लौकीचं पिक घेणं सुरू केलं. लवकरच त्यांनी एक छोटी नर्सरीही सुरू केली. पण पावसाच्या अनिश्चिततेमुळे पाण्याची कमतरता भासत होती.

त्यामुळे त्यांचं आलेलं पिक खराब होत होतं. बारिया यांनी NAIP कडे मदत मागितली. इथे त्यांना सल्ला देण्यात आला की, वेस्ट ग्लूकोज पाण्याच्या बॉटलच्या मदतीने एक सिंचन टेक्निक वापरा. त्यांनी २० रूपये प्रति किलो दराने ग्लूकोज प्लास्टिकच्या बॉटलचा वापर केला आणि पाण्यासाठी एक इनलेट करण्यासाठी वरचा भाग कापला. ही बॉटल त्यांनी नंतर या झाडांजवळ लटकवल्या.या बॉटलपासून त्यांनी एका एका थेंबाचा स्थिर पाण्याचा प्रवाह तयार केला. त्यांनी त्यांच्या मुलांनाही शाळेत जाण्याआधी या बॉटल्समध्ये पाणी भरण्यास सांगितले. 

फक्त एवढ्या उपायाने ते सीझन संपल्यानंतर 0.1-हेक्टेयर जमिनीतून 15,200 रुपयांचं उत्पादन  घेऊ लागले. या उपायाने ते झाडांना दुष्काळापासून वाचवू शकत तर होतेच सोबतच याने पाण्याची नासाडीही टाळली जात होती. पाण्याचा पुरेपुर आणि योग्य वापर होत होता. तसेच या टेक्निकने कचऱ्यात फेकल्या जाणाऱ्या ग्लूकोजच्या प्लास्टिक बॉटलचा वापर होऊ लागला. ही टेक्निक लवकरच गावातील इतरही शेतकऱ्यांनी अंगीकारली. रमेश बारिया यांना जिल्हा प्रशासनाने आणि मध्य प्रदेश सरकारने सन्मानितही केले.

क्या बात! 150 वर्षे जुन्या झाडाची एक फांदीही न तोडता बांधलं अनोखं घर, दूरदूरून बघायला येतात इंजिनिअर!

लय भारी! शेतकऱ्यानं केली कमाल; घराच्या छतावर फुलवली ४० प्रकारच्या आंब्याची बाग

टॅग्स :FarmerशेतकरीInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सMadhya Pradeshमध्य प्रदेश