बोंबला! लग्नाच्या दिवशी बदलली नवरी, नवरदेवाने विचारलं तर म्हणाले, मेकअपने तसं वाटत असेल....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 11:37 AM2020-02-04T11:37:33+5:302020-02-04T11:47:10+5:30

वेगवेगळ्या सिनेमात तुम्ही पाहिलं असेल की, लग्नाच्या वेळेवर नवरी बदलण्यात येते आणि जेव्हा नवरदेवाला याची माहिती मिळते तेव्हा एकच गोंधळ उडतो.

Family changed bride on marriage day in Madhya Pradesh | बोंबला! लग्नाच्या दिवशी बदलली नवरी, नवरदेवाने विचारलं तर म्हणाले, मेकअपने तसं वाटत असेल....

बोंबला! लग्नाच्या दिवशी बदलली नवरी, नवरदेवाने विचारलं तर म्हणाले, मेकअपने तसं वाटत असेल....

Next

वेगवेगळ्या सिनेमात तुम्ही पाहिलं असेल की, लग्नाच्या वेळेवर नवरी बदलण्यात येते आणि जेव्हा नवरदेवाला याची माहिती मिळते तेव्हा एकच गोंधळ उडतो. अशीच एक घटना प्रत्यक्षात घडली आहे. मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात वेळेवर नवरीच बदलून टाकल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. भिंड येथील परमाल सिंग बैसांदरने त्याच्या मुलीचं लग्न बढपुरा येथील तरूण रूपेंद्र तिवारीसोबत ठरवलं होतं. मुलगी पसंत आल्यावर साखरपुडा गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात झाला होता. 

पण १६ जानेवारीला एका रिवाजावेळी मुलगीच बदलून टाकली आणि तिच्या जागेवर कोलकातामधील एका तरूणीला नवरीचे कपडे घालून बसवलं. तरूणाच्या घरच्यांना मुलगी बदलल्याचा संशय आला आणि तशी शंका त्यांनी मुलीच्या वडिलांकडे बोलून दाखवली.

यावर मुलीचे वडील परमाल बैसांदर इतर काही लोकांनी सांगितले की, मेकअपमुळे मुलीचा चेहरा बदललेला दिसत असेल. यावर तरूणाने विश्वास ठेवला आणि तो विषय तिथेच संपवला.

लग्नानंतर जेव्हा नवरी सासरी पोहोचली तेव्हा खुलासा झाला की, रूपेंद्रचं लग्न दुसऱ्याच मुलीसोबत लावून देण्यात आलं. त्यानंतर तरूणाच्या कुटूंबीयांनी पोलिसांना ही घटना सांगितली. पोलीस लगेच मुलीच्या घरी गेले तेव्हा सगळ्या गोष्टीचा खुलासा झाला. मुलीच्या घरच्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 


Web Title: Family changed bride on marriage day in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.