शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

अखेर दोन महिन्यांनंतर तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने मे महिन्यात कडक लॉकडाऊन केल्यामुळे, परिणामी मजूर गावाकडे गेल्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने मे महिन्यात कडक लॉकडाऊन केल्यामुळे, परिणामी मजूर गावाकडे गेल्यामुळे हे कामदेखील रखडले होते. मात्र, मजूर गावाकडून परतल्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे तब्बल दोन महिन्यांनी तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. सध्या रेल्वे प्रशासनातर्फे शिरसोली ते माहेजीदरम्यान सपाटीकरणाचे व पूल, बोगदे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या दोन वर्षांपासून जळगाव ते मनमाडदरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील पहिला टप्पा जळगाव ते शिरसोलीदरम्यान हाती घेण्यात आला असून, या मार्गावर रूळ टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, विद्युतीकरण करणे, सिग्नल यंत्रणा उभारणे आदी तांत्रिक कामे रखडली आहेत. परिणामी, ही महत्त्वाची कामे गेल्या सहा महिन्यांपासून रखडली असल्याने, जळगाव ते शिरसोलीपर्यंतचा पहिल्या टप्प्या पूर्ण होण्यास दिवसेंदिवस विलंब होत आहे. रेल्वे प्रशासनाने मे २०१९ मध्ये पिंप्राळा रेल्वे गेटपासून तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाचा शुभारंभ केला होता. जळगाव ते शिरसोली हा साडे अकरा किलोमीटरपर्यंतचा पहिला टप्पा वर्षभरात पूर्ण करण्याचे नियोजन ठेवले होते. त्यानुसार कामालाही वेगाने सुरुवात करण्यात आली.

मात्र, मार्च २०२० पासून कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर, हे काम सहा महिने बंद होते. त्यानंतर या कामाला सुरुवात झाली खरी; मात्र अधून-मधून लागणाऱ्या लॉकडाऊमुळे मजूर वर्ग गावाकडे परतत असल्यामुळे हे कामही बंद पडत आहे. त्यामुळे दोन वर्षे उलटूनही शिरसोलीपर्यंतचा पहिला टप्पाही पूर्ण न झाल्यामुळे हे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.

इन्फो :

दोन महिन्यांनंतर दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू

कोरोनामुळे दोन महिन्यांपासून बंद असलेल्या तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. मात्र, अपूर्ण अवस्थेत असलेले पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण न करता, रेल्वे प्रशासनाने शिरसोली ते माहेजीदरम्यान दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या ठिकाणी सुरुवातीला जेसीबीच्या साहाय्याने जमीन सपाटीकरणाचे काम करण्यात येत असून, वाटेत असलेल्या लहान-मोठे नाले व नद्यांच्या ठिकाणी पूल व भुयारी बोगदेही उभारण्यात येत आहेत. दरम्यान, हे काम करत असताना, पहिल्या टप्प्यातील रखडलेल्या कामांनाही लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

कोरोनामुळे मधल्या काळात बंद असलेले तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम, शिरसोलीपासून पुढे पुन्हा सुरू झाले आहे. माहेजीपर्यंत हे काम असणार आहे. तसेच जळगाव ते शिरसोलीदरम्यान अपूर्ण असलेल्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे.

-पकंज डावरे, उपमुख्य अभियंता, भुसावळ रेल्वे विभाग