शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता ओलांडताना सालार नगरवासीयांचा जीव मुठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. मात्र, त्याच वेळी काही ठिकाणी रस्ता ओलांडण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. मात्र, त्याच वेळी काही ठिकाणी रस्ता ओलांडण्याची सोय करून देण्याकडे महामार्ग प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या ठिकाणी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना धार्मिक स्थळे, तसेच शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे या ठिकाणी अंडरपास करून देण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी कायमच केली होती, त्यासाठी परिसरातील नागरिकांनी काही महिने आधी महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर आंदोलनही केले होते. सध्या रस्ता ओलांडायचा असेल, तर सालारनगर आणि मिल्लतनगरातील नागरिक जीव मुठीत घेऊन जात आहेत.

गेल्या वर्षी डिसेंबर आणि यंदा जानेवारी या रस्त्यावर काही दिवसांच्या अंतराने अपघात झाले होते. त्यानंतर, पुन्हा या ठिकाणी अंडरपासच्या मागणीने जोर धरला. या परिसरात दोन्ही बाजूंना मोठी वस्ती आहे, तसेच ओलांडण्यासाठी इच्छा देवी ते अजिंठा चौफुली या दरम्यान एकही जागा नाही. त्यामुळे या ठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी जागा मिळावी, अशी मागणी नागरिकांनी वेळोवेळी केली होती.

काय आहेत नागरिकांच्या मागण्या

अजिंठा चौफुली ते इच्छादेवी या दरम्यान सर्विस रोड करावा

मिल्लत हायस्कूलकडे जुन्यात अंडरपासमधून पाण्याचा निचरा होतो. तेथे एका मार्गातून रहदारीसाठी रस्ता करून द्यावा.

सालारनगर-मिल्लतनगर येथे अंडरपास करून रहदारीची स्वतंत्र सोय करून द्यावी.

पोलिसातही तक्रार

१२ जानेवारी, २०२१ रोजी जिल्हा मणियार बिरादरीचे फारुक शेख यांनी याबाबत येथे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे तातडीने उपाययोजना कराव्यात, यासाठी माहिती दिली होती. मात्र, पाचच दिवसांनी येथे अपघात झाला. त्यावेळी पोलिसांत सदोष मनुष्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही शेख केली होती.

आता काय आहे मागणी

शहरातील बहुतेक प्रमुख चौकांमध्ये महामार्ग प्राधिकरणाने अंडरपास केलेले नाहीत. त्यामुळे आता जर अजिंठा चौफुलीला जर उड्डाणपूल केला जात असेल, तर त्यासोबतच सालारनगरात येणाऱ्या उताराखालून रस्ता ओलांडण्यासाठी जागा करून द्यावी, अशी मागणीही परिसरातील नागरिकांनी केली आहे.

कोट - या परिसरात अंडरपास असावा, अशी आमची आग्रही मागणी आहे. यासाठी आम्ही पाठपुरावाही करत आहोत. येथे अनेक वेळा अपघात होत असतात. याबाबत वेळोवेळी कायदेशीर मार्गाने संबंधित यंत्रणांना माहिती दिली आहे.

- फारुक शेख, जिल्हा मणियार बिरादरी