शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

धावेल, पावेल कधी हे आघाडी सरकार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 4:25 PM

महाविकास आघाडी सरकारला दोन महिने होत आले तरी हे सरकार अद्याप बाल्यावस्थेत दिसून येत आहे. स्थगिती, चौकशी याच्या पलिकडे जाऊन जनतेच्या प्रश्नांविषयी सरकार गांभीर्याने काम करीत आहे, असे दिसत नाही. कर्जमाफीचा विषय त्याच श्रेणीत आहे.

ठळक मुद्दे जळगावच्या पालकमंत्र्यांनी सोमवारी नियोजन समितीची बैठक बोलावली आहे. त्यातून काही दिशा मिळेल, अशी अपेक्षा करुया. नंदुरबार व धुळ्यात निवडणुका असल्याने सगळेच ठप्प होते. के.सी.पाडवी, अब्दुल सत्तार हे अनुभवी लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी जिल्ह्यांच्या प्रश्नांमध

मिलिंद कुलकर्णीशिवसेना, राष्टÑवादी व काँग्रेस या तीन पक्षांचा समावेश असलेले महाविकास आघाडी सरकार दोन महिन्यात स्थिरस्थावर झाले असले तरी अद्याप गती मिळाली आहे, असे जाणवत नाही. कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी करताना जिल्हा प्रशासन, जिल्हा बँका काय घोळ करतात, हे अनुभवाने शेतकऱ्यांना माहित आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांमधील अनुभवी मंत्री सरकारमध्ये असताना गतीमान प्रशासनाची अपेक्षा फोल ठरु नये.खान्देशचा विचार केला तर २० पैकी १३ आमदार हे अनुभवी आहेत. मंत्र्यांचा विचार केला तर अ‍ॅड.के.सी.पाडवी हे सर्वाधिक अनुभवी आमदार आहेत, ते जरी पहिल्यांदा मंत्री झाले असले तरी त्यांच्या दीर्घ अनुभवामुळे विकासाचा गाडा ते सहजपणे हाकू शकतात, हा विश्वास आहे. गुलाबराव पाटील यांना मंत्रिपदाचा अनुभव आहे. पालकमंत्री म्हणून दोघेही प्रथमच काम पाहत असले तरी लोकप्रतिनिधी म्हणून अनुभवाचा फायदा त्यांना निश्चित होईल. मराठवाड्यातील अब्दुल सत्तार यांना धुळ्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यांनी अद्याप धुळ्याला भेट दिलेली नाही. मात्र तेही अनुभवी असल्याने आणि काँग्रेस सरकारमध्ये काही काळ त्यांच्याकडे धुळ्याचे पालकमंत्रीपद होते, त्यामुळे धुळ्याची त्यांना माहिती आहे.आदिवासी विकास आणि पाणीपुरवठा व स्वच्छता ही दोन खाती खान्देशच्या मंत्र्यांकडे आहेत. दोन्ही महत्त्वपूर्ण खाती आहेत. त्याचा लाभ खान्देशला व्हायला हवा. खान्देशातील दहा तालुके हे आदिवासीबहुल आहेत. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत, परंतु, त्या खºया लाभार्र्थींपर्यंत पोहोचत नाही, हा पूर्वापार अनुभव आहे. त्यामुळे स्थलांतर हा प्रश्न गंभीर बनला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आश्रमशाळा, वसतिगृहे अशा सुविधा असतानाही गळतीचे प्रमाण मोठे आहे. वनजमिनी, सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न यातही मंत्री पाडवी यांना लक्ष घालावे लागणार आहे.तीच स्थिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता या विषयाची आहे. खान्देशात शिरपूरवगळता एकाही शहरात रोज पाणीपुरवठा होत नाही. स्त्रोत, पाणी योजना, वितरणातील असमानता असे अनेक प्रश्न पालिका आणि नगरपंचायतींपुढे आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रभावीपणे अंमलात आणल्या जात नाही. ठेकेदारांकडून विलंब होतो आणि त्याकडे लोकप्रतिनिधी सहेतूक दुर्लक्ष करतात, हा अनुभव आहे. स्वच्छतेचा विषयदेखील तसाच आहे. स्वच्छता अभियान, स्मार्ट सिटी अशा घोषणा खूप झाल्या. अनेक शहरे आणि गावे कागदावर हगणदरीमुक्त झाली, पण वास्तव वेगळेच आहे. त्यात मंत्री पाटील यांनी कठोरपणे कार्यवाही करायला हवी, ही अपेक्षा आहे. दिखावूपणापेक्षा टिकावू कामाला प्राधान्य देण्याची गरज आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव