शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:18 IST

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? विद्यार्थ्यांमध्ये नाराजी : तत्काळ निर्णय घेण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : करोनाच्या प्रादुर्भावामुळे शालेय ...

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय?

विद्यार्थ्यांमध्ये नाराजी : तत्काळ निर्णय घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : करोनाच्या प्रादुर्भावामुळे शालेय शिक्षण विभागाने इयत्ता बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या. मात्र, या परीक्षा नेमक्या कधी होणार आहेत, याबाबत अजूनही याबाबत स्पष्टता नाही. दुसरीकडे बारावीच्या परीक्षेसाठी काय पर्याय असू शकतो, यावर शासन विचाराधीन आहे. तर मोजक्या महत्त्वाच्या अनिवार्य असलेल्या विषयांची परीक्षा शासनाने घ्यावी, असा पर्याय महाविद्यालयातील प्राचार्यांकडूनही सुचविण्यात आला आहे.

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली, तर बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, मे महिनाही संपण्यात आला. ही परीक्षा कधी होईल, वर्ष वाया जात आहे, अशी प्रतिक्रिया आता विद्यार्थ्यांमधून उमटायला लागली आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेसाठी सीबीएसईने दोन पर्याय सुचविलेले आहेत. त्यामध्ये मोजक्या महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घ्यावी, जेणेकरून कमी दिवसात परीक्षा आटोपल्या जातील तसेच बारावीत विद्यार्थी ज्या कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत तिथेच परीक्षा घेतली जाऊ शकते, असा पर्याय दिला आहे. दरम्यान, जळगाव शहरातील महाविद्यालयातील प्राचार्यांनीदेखील महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घ्यावी, असा पर्याय सुचविला आहे. तर काहींनी परीक्षेआधी विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे, असेही सुचविले.

===============

काय असू शकतो पर्याय?

बारावीची परीक्षा ही झाली पाहिजे. पण, अत्यंत महत्त्वाचे असणाऱ्या विषयांची परीक्षा व्हावी. जेणेकरून कमी कालावधीत परीक्षा पूर्ण होईल. सोबतच सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल आणि विद्यार्थ्याच्या आरोग्याची काळजीदेखील घेता येईल, हा पर्याय चांगला राहील. तीन दिवस कला, तीन दिवस वाणिज्य व तीन दिवस‍ विज्ञान शाखेची परीक्षा घ्यावी. अर्थात ९ दिवसात बारावीची परीक्षा संपेल व निकालही लवकर लावता येईल.

- एल. पी. देशमुख, प्राचार्य, नूतन मराठा महाविद्यालय

--------

परीक्षाबरोबर विद्यार्थ्यांचे आरोग्यदेखील तेवढेच महत्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी न खेळता परीक्षा रद्द करण्याचा पर्यायही योग्य राहील. जर परीक्षा घ्यायचा निर्णय झाला तर त्या आधी संपूर्ण परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे शासनाने लसीकरण करावे. त्यानंतरच परीक्षा घ्यावी.

- अनिल लोहार, प्राचार्य, बाहेती महाविद्यालय

--------

बारावीची परीक्षा ही घेतली गेली पाहिजे. कारण, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे निकष खूप महत्त्वाचे आहेत. पुढे जाऊन त्यांना फार महत्त्वाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावयाचा असतो. सरसकट परीक्षा घेणे शक्य नसेल तर किमान ज्या विषयांवर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश अनिवार्य आहे, अशा विषयांची परीक्षा घेतली गेली पाहिजे. जर परीक्षा घेणे शक्य नसेल तर ज्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते ती अत्यंत पारदर्शीपणे घेतल्या जाव्यात.

- गौरी राणे, प्राचार्य, डॉ .अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महाविद्यालय

===============

- काय म्हणतात विद्यार्थी....

अभ्यासपूर्ण झालेला आहे. पण, परीक्षेचा निर्णय होत नाही. वेळ जात आहे. परिणामी, पुढे कशाला प्रवेश घ्यावा हे आता सुचेनासे झाले आहे. त्यामुळे तात्काळ निर्णय घ्यावा. परीक्षा जरी घेतली तरी आम्ही त्याला तयार आहोत. निर्णय घेण्यास जर उशीर झाला तर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होईल.

- चेतन बाविस्कर, विद्यार्थी

-----------

परीक्षा घ्यायला हवी. परीक्षा झाली नाही तर पुढे प्रवेश प्रक्रियेच्यावेळी विद्यार्थ्यांना अडचणी येतात. त्यामुळे परीक्षेसंदर्भातील निर्णय लवकर व्हावा. आणि परीक्षा घेण्याआधी शासनाने विद्यार्थ्यांचे लसीकरण घ्यावे.

- रितू पाटील, विद्यार्थिनी

-----------

परीक्षा होणे गरजेचे आहे. त्यासाठी निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महाविद्यालयांनी सुध्दा संपूर्ण काळजी घ्यावी.

- पल्लवी कंडारे, विद्यार्थिनी

===================

बारावीचे एकूण विद्यार्थी : ४९,४०३

विज्ञान : २०,१९४

कला : २०,४९१

वाणिज्य : ६,२९५

एमसीव्हीसी : २,४२३