शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
4
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
5
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी लावलेली रोपे मरणाला ‘टेकली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:15 IST

मेहरून तलाव : मनपाच्या दुर्लक्षामुळे झाडांची होतेय दिवसाढवळ्या कत्तल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या दोन वर्षांपूर्वी मेहरुन तलावाभोवती ...

मेहरून तलाव : मनपाच्या दुर्लक्षामुळे झाडांची होतेय दिवसाढवळ्या कत्तल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या दोन वर्षांपूर्वी मेहरुन तलावाभोवती मनपाने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलेली रोपे सध्या पाण्याअभावी पूर्णपणे कोमेजून मरणावस्थेला आली आहेत, तर दुसरीकडे मनपाकडून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कुठलीही देखभाल करण्यात येत नसल्याने नागरिकांकडून दिवसाढवळ्या झाडांची कत्तल होत आहे. त्यामुळे मेहरुन तलावाच्या अस्तित्वासाठी मनपाने लक्ष देण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी मेहरुन तलावाभोवती ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली होती. तत्कालीन महापौर भारती सोनवणे यांनी या झाडांना पाणी देण्यासाठी एका मक्तेदाराची नियुक्तीही केली होती. त्यामुळे गेल्या वर्षी संबंधित मक्तेदारातर्फे उन्हाळ्यात नियमित या रोपांना पाणी देऊन ही रोपे जगविण्यात आली. मात्र, यंदा संबंधित मक्तेदारातर्फे कुठल्याही प्रकारचे पाणी अथवा उपाययोजना करण्यात येत नसल्यामुळे ही झाडे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याअभावी वाळत आहेत. त्यामुळे वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांचा उपयोग काय, असा प्रश्न नागरिकांतर्फे उपस्थित करण्यात येत असून, मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

इन्फो :

झाडांचीही दिवसाढवळ्या कत्तल

या परिसरात नागरिक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येत असतात. त्यामुळे झाडांची कत्तल होत असल्याचा प्रकार दिसल्यावर तात्काळ अडविले जाते. मात्र, सध्या उन्हाळा आणि त्यात कोरोनाचे निर्बंध असल्याने नागरिक दुपारनंतर घराबाहेर निघणे टाळतात. नेमक्या याच संधीचा फायदा घेत काही नागरिक मेहरुन तलावाभोवती असलेली झाडे तोडत असल्याचे प्रकार परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येत आहेत. तसेच काही नागरिक झाडांच्या मधोमध कुऱ्हाडीने घाव घालून, झाडांना खड्डे पाडत असल्याने ही झाडे आपोआप काही दिवसांनी पूर्णपणे वाळत आहेत. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

इन्फो :

गेल्या वर्षी मनपाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार नियमितपणे रोपांना पाणी देऊन झाडे जगवली. मात्र, यंदा या ठेकेदाराने झाडांना पाणी देण्याबाबत कुठलीही व्यवस्था न केल्यामुळे झाडे वाळत आहेत. तसेच दुसरीकडे मनपाच्या दुर्लक्षामुळे काही नागरिक झाडेही तोडण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे शहराचे हे वैभव टिकण्यासाठी मनपाने लक्ष देणे गरजेचे आहे.

विजय वाणी, सचिव, मराठी प्रतिष्ठान

इन्फो :

ठेकेदार प्रतिसाद देईना

‘लोकमत’ प्रतिनिधीने गेल्या वर्षी या रोपांना नियमित पाणी दिलेल्या ठेकेदाराशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनी मेहरुन तलावाच्या संवर्धनाबाबत लक्ष देण्याची मागणी परिसरातील रहिवासी व पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.