शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

वेदातले समंत्रक शब्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 3:25 PM

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘नित्य नवे वेद’ या सदरात लिहिताहेत साहित्यिक प्राचार्य डॉ.विश्वास पाटील

वेदिक काळात पाणी वहाण्यासाठी पखाली होत्या. ऋषी म्हणतो की, हे देवा, पखालीचे मुख खुले करा. पाऊस असा बदाबदा पडतो. पावसाच्या या धारांंनी धरणीला कंठ फुटतो. इथली बेडकंही मग गाणी गाऊ लागतात. गावातील, रानातील तळी समृद्ध होतात. ती गाऊ लागतात. यासोबत गाय-वासरांचे ध्वनी निनादतात. शेळ्या-कोकरांचा स्वर नाद वातावरणाला भारून टाकतो. पाऊस असा पावसाळाभर येतच राहतो. पाणी देवाजीच्या करूणेसारखं वाहू लागतं. नद्या-नाल्यांना पूर येतात. ओढे खळाळू लागतात. जनावरं पुष्ट होतात. भरपूर पाऊस होतो. धनधान्याची सुबत्ता नांदते. प्रार्थनेचा स्वर जागतो. हे पर्जन्य देवा, भरल्या मनानं ये. तू आता कोरड्या दिशांचा माग घे. कोरड्या दिशांना जा. केवळ आपल्यापुरतीच ही प्रार्थना नाही. या प्रार्थनेला सार्वत्रिक तेचा असा सहज स्पर्श आहे. खरी प्रार्थना पर्जन्यदेवही अर्थातच् ऐकून घेतो. आपल्याच लाभाचा लोभ न धरणारा माणूस त्याला आवडतो. तो पुढं निघून जातो. मागे वहात्या नद्या सोडून जातो. मग नद्याच माता बनतात. आई बनतात. करूणानिधान बनतात.वेद ज्ञानाचं साधन. वेद संवेदनेचा विषय. अनेकदा आपण वाचतो. ते सारं समजलेलं असतंच असं नाही. वेदाचा हा महिमा आहे. जे कळलं ते प्रकट करून सांगता यायला हवंय. जे जाणून घेतलं ते समजावता यायला हवं. ते जगून दाखवता यायला हवं. आत्मप्रकटीकरणाची विद्या म्हणजे वेदविद्या. वेदातले शब्द अर्थघन. या शब्दात खूप अर्थ भरला आहे. जणू काही बरसणारा ढगच.हे शब्द अर्थभारित घनासारखे तृप्त. एका प्रक्रियेनं या शब्दाचा एक अर्थ निघतो तर दुसऱ्या प्रक्रियेने वेगळा. दोघांमध्ये विरोधाचं काहीही कारण नाही. प्राण, वाणी आणि मन जुळलं की शब्द आकाराला येतो. यामुळे वेद हे प्राणमय आहेत. इंद्रीयमय आहेत. मनोमय आहेत. वेद म्हणजे शब्द ब्रह्म.वेदाची भाषा कमालीची विनम्र आहे. वेद प्रत्यक्षात बोलत नाही. परोक्षात बोलतो. ‘हे करा.’ असं नाही सांगत. ‘असं करणं चांगलं.’ असं सांगतो. ‘असं करा. ‘हे नाही सांगत. ‘चला, असं करू या.’ हे सांगतो. ही शब्दकळा समजून घेऊ या. निनाद करणारी नदी. सर सर करणारी सरिता, गं गं करणारी गंगा. धारण करणारी धरणी. पसरलेली पृथ्वी. वैदिक शब्द अशाप्रकारे सूक्ष्म अर्थाचं वहन करतात. वेदातील साहित्याचा पोत जीवनधर्मी. ऋषी आणि कृषी संस्कृतीचा उद्गाता. इथं शेती आहे. गायी-गुरं आहेत. सूर्यदेव आहे. चंद्र सखा आहे. दाहक अग्नी येथे प्रेमळ बाप बनतो. तो झळाळत राहतो. तो न्यायाची ज्योत प्रदीप्त राखतो. छान-छान भेटी देतो.सुखदायी ठरतो. सखा-सोबती होतो. अंधारगर्भ अशी रात्र सरते. उजळणारी उषा येते. आकाशाची बाळी धरणीपुत्राला भेटायला येते. ही स्वर्गाची कन्यका वाटते. ही भरल्या घरची लेक-सून वाटते. ही नटून-थटून असते. ही झगमगत्या रथातून येते. सूर्याचं एक नाव आहे आदित्य. दा म्हणजे देणारा, दाता. घेऊन जाणारा तो सूर्य. सूर्य काय बरं घेऊन जातो? तो आपल्या आयुष्याचा एक भाग घेऊन जातो. हे आपण लक्षात ठेवायला हवं. अस्ताला जाणारा सूर्य आपल्या आयुष्याचा एक खंड घेऊन जात असतो. धरणीचा आधार सत्य. आकाशाचा आधार सूर्य. (क्रमश:)-डॉ.विश्वास पाटील, शहादा, जि.नंदुरबार

टॅग्स :literatureसाहित्यnandurbar-pcनंदुरबार