शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

भरसभेत 'टरबुज्या' शब्द उच्चारत उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली म्हणाले, "असा माणूस..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 16:37 IST

तीन वाक्यात तब्बल पाच वेळा केला 'टरबुज्या' शब्दाचा उल्लेख

Uddhav Thackeray vs BJP : भाजपा विरूद्ध इतर विरोधी पक्ष असा लढा महाराष्ट्रात आता हळूहळू अधिकच तीव्र होताना दिसतो आहे. सुरूवातीला शिंदे गट आणि नंतर अजित पवार गट यांच्या पाठिंब्याने भाजपा युतीचे सरकार राज्यात अधिक मजबूत होत आहे. अशातच जालना येथे मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले. आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केल्याचा दावा करत, पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. त्यामुळे हे आंदोलन अधिकच चिघळल्याचे चिन्ह आहे. तशातच आज जळगाव मध्ये उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी एकदा नव्हे तर तब्बल ४-५ वेळा टरबुज्या असा शब्द उच्चारला.

उद्धव ठाकरे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांना G20 परिषदेसाठी दिल्लीला जायला वेळ आहे, पण जालना मध्ये जरांगे यांच्याशी संवाद साधायला वेळ नाही. त्यांच्या मागण्या काय इतकं तरी त्यांनी विचारायला हवे. पण तसे घडले नाही. पोलिसांनी खरं खरं सांगावं की आपल्या मनात आलं म्हणून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनात तुम्ही तुमचा ताफा घुसवू शकता का? एखाद्या आंदोलनकर्त्यांच्या समुदायावर स्वत:च्या मनाने लाठीचार्ज करू शकता का? हवेत गोळीबार किंवा अश्रूधुराच्या नळकांड्या फोडू शकता का? मला स्पष्टपणे असं वाटतं की जसा काही वर्षांपूर्वी जालियनवाला बाग हत्यांकांड झालं होतं, तसा हा कोणी तरी 'जालनावाला कांड' करू पाहतंय.... सगळ्यांच्या तोंडी एकच नाव आहे"

तब्बल ५ वेळा उच्चारला टरबुज्या शब्द 

ठाकरेंच्या त्या वाक्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांमधून जोरजोरात ओरडाआरडा ऐकू आला. त्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा बोलू लागले. ते पुढे म्हणाले,"आता ऐका, मला हा माणूस माहिती नाही, तुम्ही जे टरबुज्या नाव घेताय असा माणूस मी पाहिलेला नाही. टरबुज्या म्हणालात ना... टरबुज्या... काय म्हणालात टरबुज्या... म्हणजे ते असं मोठं टरबूज असतं ते? मी, असा माणूस पाहिलेला नाही, पण तुम्ही टरबुज्या म्हणालात ना... ठीक आहे, आता मी टरबुजा सारखा (दिसणारा) माणूस बघतो. टरबूज कोण आहे ते पण मी बघेन, पण तुम्हाला माहितीये, मला नंतर सांगा."

दरम्यान, भाजपा पक्ष संपवल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) केला. "देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा संपवला. नाथाभाऊला संपवलं. सफाचट केलं. सर्व उपरे घेतले. आयाराम घेतले. भाजप कार्यकर्त्यांच्या उरावर बसवले. सर्व आयाराम आहेत. अयोध्येत राम मंदिर बनवलं जात आहे, तसंच आयाराम मंदिर बनवणार आहेत. हे आयाराम लोकं आहेत," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रMaratha Reservationमराठा आरक्षण