शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

तरुणाच्या खून प्रकरणात दोघांना जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:30 PM

१७ महिन्यापूर्वीची घटना : दारु कमी भरल्याचे कारण

जळगाव : मेहरुण शिवारातील शिवाजी उद्यानात सोनू गोरख साळुंखे (पाटील) (१९, रा.मिलिटरी कॉलनी, तांबापुरा) या तरुणाच्या खून प्रकरणात मोहन चंद्रकांत जाधव उर्फ प्यारे मोहन (१९) व गुड्डू उर्फ कनशा वहाब शेख खून (२२, रा.तांबापुरा) या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. न्या.पी.वाय.लाडेकर यांनी सोमवारी हा निकाल दिला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल २०१८ रोजी मयत सोनू गोरखसिंग साळुंखे, मच्छिंद्र तुकाराम नाथ( २३), मोहन जाधव(१९) व कानशा शेख( २२) हे चौघे जण शिरसोली नाकाजवळील हॉटेलवर मद्यप्रशान करण्यासाठी बसले होते. दरम्यान, सोनू याने गुड्डूच्या ग्लासात कमी दारु टाकली या कारणावरुन चौघांमध्ये वाद झाला होता.त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवाजी उद्यान परिसरात गुराख्याला झुडपांमध्ये सोनूचा मृतदेह आढळून आला होता.११ साक्षीदारांची तपासणीजिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी युक्तीवाद करुन गोपाळ बाटुंगे, जयसिंग पाटील, जितेंद्र गायकवाड, डॉ. विजय कुरकुरे व तपासाधिकारी समाधान पाटील यांच्यासह ११ साक्षीदार तपासले. साक्ष व परिस्थिती जन्य पुरावे लक्षात घेत न्यायालयाने चंद्रकांत जाधव व कानशाशेख यांना जन्मठेप व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर मच्छिंद्र तुकाराम नाथ याची निर्दोष सुटका करण्यात आली.‘लोकमत’ चा अंदाज ठरला होता तंतोतंत खरात्याच्या शरीरावर जखमा दिसत नसल्या तरी नाकातून व कानातून रक्त आलेले होते. घटनास्थळावर गोठलेले रक्त होते. त्याशिवाय दिवसा माणूस जावू शकत नाही अशा ठिकाणी त्याचा मृतदेह होता.त्यामुळे हा खून असल्याचा संशय ‘लोकमत’ ने व्यक्त केला होता, मात्र दारुच्या नशेतच त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त करुन अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदन अहवालात डोक्याला दुखापत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, शरद भालेराव, भरत लिंगायत व अशोक सनगत यांनी तपास करीत आरोपींनाच पोलिसात हजर केले होते. त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव