शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

दोन सुवर्ण पदक व तब्बल ५५० बक्षीसे तरीही हवालदाराची पदोन्नतीसाठी उपेक्षाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 12:22 IST

जळगाव : आपल्या कामगिरीच्या बळावर दोन सुवर्ण पदक, एक कास्य पदक, पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह यासह तब्बल ५५० बक्षिसे मिळविलेले ...

जळगाव : आपल्या कामगिरीच्या बळावर दोन सुवर्ण पदक, एक कास्य पदक, पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह यासह तब्बल ५५० बक्षिसे मिळविलेले जिल्हा पोलीस दलातील हवालदार विजय देवराम पाटील यांची पदोन्नतीत सातत्याने उपेक्षा होत आहे. सहायक फौजदार व फौजदार अशा दोन्ही पदांसाठी पात्र असताना पाटील यांना लालफितीचा फटका बसत आहे.क्षमता सहनशीलतेच्या पलीकडे गेल्याने पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच दाद मागितली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयात पत्रव्यवहार होताच, त्याची दखल घेण्यात आली असून जिल्हा पोलीस दलाकडून माहिती मागविण्यात आली आहे.विजय पाटील हे १९९० मध्ये पोलीस दलात खुल्या प्रवर्गातून शिपाई पदावर रुजू झाले. हवालदार पदावरही आठ वर्ष उशिराने पदोन्नती मिळाली. आता सेवा ज्येष्ठतेनुसार सहायक उपनिरीक्षक पदावर पात्र असूनही पदोन्नती मिळालेली नाही. मागून सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना २०१७-१८ या वर्षात पदोन्नती मिळाली. पदोन्नतीबाबत अन्याय झाल्याचे पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिले, मात्र महासंचालकांकडून मार्गदर्शन मागविण्यात येत असल्याचे कारण सांगून या विषयाकडे दुर्लक्ष केले गेले. तब्बल चार वेळा स्मरण पत्र देवूनही त्याची दखल घेतली गेली नाही.विजय पाटील सध्या स्थानिक गुन्हे शाखेत अभिवेक्षण कक्षात कार्यरत आहेत. मंत्रालयातूनच पदोन्नतीच्या प्रकरणांमध्ये हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.फौजदार पदाची परीक्षा उत्तीर्णविजय पाटील हे २०१३ मध्ये खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. उच्च न्यायालयानेही या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे ज्या जिल्ह्यात परीक्षा उत्तीर्ण कर्मचारी आहेत व तेथे रिक्त होणाºया जागांवरच त्याच महिन्यात उपनिरीक्षक पदावर निवड करण्याचे आदेश आहेत. मात्र जिल्हा पातळीवर या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात येत आहे.सहायक फौजदार व फौजदार या दोन्ही पदासाठी पात्र असतानाही लालफितीमुळे राज्यात अनेक कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित आहेत तर काही जण निवृत्त झाले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून विचारणा झाली आहे. आता निर्णयाची अपेक्षा आहे. हिंदकेसरी विजय चौधरी यांना थेट पोलीस उपअधीक्षक पद मिळू शकते, तर मग आपल्यालाही राष्टÑीय पातळीवर बक्षीस मिळालेले आहेत, मग आपल्याला का नाही?-विजय देवराम पाटील, हवालदारपदोन्नतीच्या प्रतिक्षेतच कर्मचारी निवृत्तखात्यांतर्गत परीक्षा देऊन उपनिरीक्षक पदास पात्र ठरलेले असोत किंवा नियमित पदोन्नती वेळेवर मिळत नसल्याचे कर्मचाºयांचे आर्थिक नुकसान तर होतच आहे, त्याशिवाय अनेक कर्मचारी पदोन्नतीच्या प्रतिक्षेतच निवृत्त होत आहेत. सरकारी कर्मचाºयांसाठी आता पाच दिवसाचा आठवडा झाला, पोलीस मात्र २४ तास कर्तव्यावर असतात. सुटी तर सोडाच पण त्यांना हक्कही मिळत नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव