शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

शासकीय कार्यालयांमध्ये आजपासून ५० टक्केच कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:47 IST

३१ मार्चपर्यंत आपत्कालीन परिस्थिती म्हणून आदेश लागू

जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजनेंतर्गत शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहे. याची अंमलबजावणी २० मार्चपासून होणार असून याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असेही सूचित केले आहे. ३१ मार्चपर्यंत आपत्कालीन परिस्थिती म्हणून हा आदेश लागू राहणार आहे.कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव कार्यालयांमध्ये होऊ नये तसेच राज्यातील अधिकारी, कर्मचारी यांना त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील गर्दी कमी करणे आवश्यक आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये केवळ ५० टक्केच अधिकारी व कर्मचारी बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यात शासकीय कार्यालयांचे तातडीचे व महत्त्वाचे काम सुरू राहण्याच्या दृष्टीने संबंधित विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दररोज कार्यालयात न बोलविता त्यांना आळीपाळीने (रोटेशन) कार्यालयात बोलवावे, अशा सूचना केल्या आहेत.यात अधिकारी व कर्मचाºयांना कार्यालयीन वेळेमध्ये लवचिकतेची सवलत देण्यासंदर्भातसुद्धा विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याचे निर्देशित केले आहे. जे अधिकारी, कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीत रजा घेऊ इच्छितात त्यांना तातडीने रजा मंजूर करण्याचा निर्णय घ्यावा, यात अधिकारी, कर्मचाºयांनी त्यांचा संपर्क पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, प्रमुखांना उपलब्ध करून द्यावा तसेच कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना मिळताच उपस्थित राहणे अनिवार्य राहील, असेही आदेशात म्हटले आहे. ३१ मार्चपर्यंत आपत्कालीन परिस्थिती म्हणून हा आदेश लागू राहणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव