शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

शासकीय कार्यालयांमध्ये आजपासून ५० टक्केच कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:47 IST

३१ मार्चपर्यंत आपत्कालीन परिस्थिती म्हणून आदेश लागू

जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजनेंतर्गत शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहे. याची अंमलबजावणी २० मार्चपासून होणार असून याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असेही सूचित केले आहे. ३१ मार्चपर्यंत आपत्कालीन परिस्थिती म्हणून हा आदेश लागू राहणार आहे.कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव कार्यालयांमध्ये होऊ नये तसेच राज्यातील अधिकारी, कर्मचारी यांना त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील गर्दी कमी करणे आवश्यक आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये केवळ ५० टक्केच अधिकारी व कर्मचारी बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यात शासकीय कार्यालयांचे तातडीचे व महत्त्वाचे काम सुरू राहण्याच्या दृष्टीने संबंधित विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दररोज कार्यालयात न बोलविता त्यांना आळीपाळीने (रोटेशन) कार्यालयात बोलवावे, अशा सूचना केल्या आहेत.यात अधिकारी व कर्मचाºयांना कार्यालयीन वेळेमध्ये लवचिकतेची सवलत देण्यासंदर्भातसुद्धा विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याचे निर्देशित केले आहे. जे अधिकारी, कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीत रजा घेऊ इच्छितात त्यांना तातडीने रजा मंजूर करण्याचा निर्णय घ्यावा, यात अधिकारी, कर्मचाºयांनी त्यांचा संपर्क पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, प्रमुखांना उपलब्ध करून द्यावा तसेच कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना मिळताच उपस्थित राहणे अनिवार्य राहील, असेही आदेशात म्हटले आहे. ३१ मार्चपर्यंत आपत्कालीन परिस्थिती म्हणून हा आदेश लागू राहणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव