शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

थर्ड आय : मूळ मुद्यांपासून राजकीय पक्ष दूर जाताहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:08 PM

साहित्यिक अशोक कौतिक कोळी यांच्या नजरेतून लोकसभा निवडणूक

रवींद्र मोराणकरजळगाव : आपल्या मतदारसंघातील प्रतिष्ठित- नावाजलेल्या कलावंत, साहित्यिक, आर्टिस्ट, सामाजिक कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीकडे कशा पद्धतीने पाहतात. त्यांच्या नजरेतून कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्र्चिले जायला हवे. याचा आढावा घेणारी मुलाखत.एक कलावंत म्हणून, तुम्ही सध्याच्या निवडणूक वातावरणाकडे कसे पाहता?सध्याची लोकसभा निवडणूक ही मला घाई-गडबडीची, राजकीय पक्षांच्या लुटूपुटूची लढाई वाटते. त्यात ठरवून मतदारांची दिशाभूल सुरू आहे का काय, असे वाटते. असंबद्ध मुद्दे व वैयक्तिक टीकाटिपणी करून मूळ मुद्यांपासून राजकीय पक्ष दूर जाताना दिसताहेत. त्यामुळे मतदारांची करमणूक होताना दिसत आहे.लोकसभा निवडणुकीत कोणते महत्त्वाचे मुद्दे असायला हवे?याऐवजी निवडणुकीत देशहिताचे व समाजहिताचे मुद्दे असायला हवेत. ज्यातून जनतेचे हित, देशाचा विकास, देशातील समाजाचे उन्नत प्रतिबिंब उमटायला हवे व निकोप स्पर्धात्मक वातावरण तयार व्हायला हवे. समाजाच्या व देशाच्या आजच्या आशा-आकांक्षा काय आहेत, हे खरं तर निवडणुकीतील मुद्यांमधून डोकायला हवे. ध्येयवाद मला या निवडणुकीत दिसून येत नाही.तुमच्या क्षेत्राशी निगडीत मुद्द्यांना राजकीय पक्ष किती महत्व देतात?हल्ली साहित्य, कला क्षेत्राला सर्वच पक्ष बेदखल करताना दिसताहेत. विचारवंत, साहित्यिक यांना अडगळीत टाकल्यासारखी परिस्थिती आहे. वास्तविक निकोप समाजस्वास्थ्यासाठी साहित्य, कला क्षेत्राला उभारी देण्याची गरज आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. विकास म्हणजे केवळ दगड विटांची बांधकामे नव्हे. निकोप मनाचा नागरिक उन्नत देश घडवू शकेल. निकोप मनाच्या घडणीसाठी निकोप साहित्य, सांस्कृतिक वातावरण हवे. अभिव्यक्तीचा संकोच होता कामा नये.नवीन मतदारांना काय आवाहन कराल?मतदानाचा अधिकार हा लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. त्याद्वारे आपला आशाआकांक्षांना सत्यात उतरवण्याची व आपल्या स्वप्नातील देश घडवणाऱ्या धुरीणांना निवडण्याची संधी असते. त्याचा वापर जरूर करावा.

टॅग्स :Jalgaonजळगाव