शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

विहिरीत आढळलं हरणाचं पिल्लू, अर्धमेल्या अवस्थेतच होतं; निसर्गप्रेमींनी घेतली धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 2:02 PM

याठिकाणी सुरक्षित आदिवास निर्माण झाल्याने अनेक वन्यप्राणी व पक्षाची वाढ होत आहे. 

जळगाव - जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील निसर्गटेकडी परिसरात सामाजिक वनीकरण विभाग व लोकसहभागातून 25 हेक्टर क्षेत्रावर गतवर्षी व यंदाच्या वर्षी जवळपास 25 हजार झाडांचे वृक्षारोपण केले आहे. या क्षेत्रात चराईबंदी असल्याने गवत, नैसर्गिक झाडे, झुडपेही मोठ्या प्रमाणात वाढीस येत असल्याने जैवविविधताही वाढीस येत आहे. याठिकाणी सुरक्षित आदिवास निर्माण झाल्याने अनेक वन्यप्राणी व पक्षाची वाढ होत आहे. 

मागील आठवड्यातच निसर्गटेकडी संकल्पना साकारण्यासाठी प्रयत्नशील असलेले पर्यावरण प्रेमी सोमनाथ माळी यांनी वृतपत्रांच्यामाध्यमातून व सोशल मीडियाच्या माध्यमातून या क्षेत्रातील वन्यप्राणी व पक्षांसाठी संरक्षणाच्या उपाययोजना करण्याची मागणी केली होती. किशोर भरत राठोड व त्यांचा मुलगा नेहमीप्रमाणे शेतात आल्यावर पाणी काढण्यासाठी आपल्या विहिरीजवळ आले तेव्हा त्यांना विहिरीत हरणाचे एक छोटस पिल्लू अदमेल होऊन पोहतांना दिसले. त्यांनी लागलीच मुलाला आवाज देऊन दोर आणायला सांगुन पन्नास फुट पाणी असलेल्या विहिरीत उडी टाकून सदर पिलाला बाहेर काढले. लागलीच निसर्गटेकडी संकल्पना साकारत असलेले सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी सोमनाथ माळी यांना या बाबत कल्पना दिली. सोमनाथ माळी यांना शेतात गेल्यानंतर वनविभागाच्या आर.एफ.ओ.शितल नगराळे यांना माहिती दिली व  निसर्गटेकडीवर आणले. 

पाण्यात जास्त वेळ राहिल्यामुळे ते अतिशय अर्धमेल्या सारखे झाले होते. पायही धरत नव्हते.आर.एफ.ओ. मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली चार तास उबदार कपड्यात गुंडाळून व बकरीचे दूध पाजत घरगुती प्रथम उपचार केल्यानंतर ते तंदुरुस्त झाल्यानंतर निसर्गटेकडी परिसरात हरणांचे कळप वास्तवास असलेल्या ठिकाणी सोडून दिले. निसर्गटेकडी परिसरातील शेतकरी वन्यप्राण्यांमुळे आपल्या पिकांचे नुकसान होत असतांनाही वन्यप्राणींना कुठलेही नुकसान, ईजा पोहचवत नाही उलट काळजीच घेतात. या शेतकऱ्याचे व आर.एफ.ओ.मॅडम, सामाजिक वनिकरण विभागाचे सुर्यवंशी यांनी सहकार्य केल्याबद्दल सोमनाथ माळी यांनी आभार माणले. 

टॅग्स :Jalgaonजळगावforestजंगल